शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

३१५७ जणांच्या तपासणीत नऊ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

जालना : आरोग्य विभागाला शुक्रवारी ३१५७ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

जालना : आरोग्य विभागाला शुक्रवारी ३१५७ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या चौघांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात ८३ सक्रिय रुग्ण असून, त्यातील काहींवर रुग्णालयात तर काहींवर अलगीकरणात उपचार सुरू आहेत.

जिल्हा आरोग्य प्रशासनाला गुरुवारी २५४९ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यात २५ जणांना बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीची चिंता व्यक्त केली जात होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मात्र, ३१५७ जणांच्या तपासणीत नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआरमध्ये ३०६८ जणांच्या तपासणीत दोघांचा, तर ॲंटिजनच्या ८९ तपासणीत सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये घनसावंगी तालुक्यातील उढाण कंढारी-१, अंबड तालुक्यातील बरसवाडा- १, वडीगोद्री- ४, चुर्मापुरी- २ व शहागड येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ४४४ वर गेली असून, त्यातील ११७९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार १८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

४५२० अहवालांची प्रतीक्षा

आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आलेल्या ४५२० जणांच्या तपासणीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. या तपासणी अहवालात किती जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो, याकडे लक्ष लागले आहे. रुग्णांची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतरासह इतर सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.