शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

१५१५ जणांची तपासणी, सहाजणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

जालना : जिल्ह्यातील १५१५ जणांची रविवारी आरटीपीसीआर व अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत केवळ सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...

जालना : जिल्ह्यातील १५१५ जणांची रविवारी आरटीपीसीआर व अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत केवळ सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ ०.४० आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या १७ जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात आरटीपीसीआरच्या १३१०, तर अँटिजनद्वारे २०५ जणांची तपासणी करण्यात आली. आरटीपीसीआरमध्ये सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर अँटिजनमध्ये एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. बाधितांमध्ये जालना तालुक्यातील नाव्हा येथील एकाचा समावेश आहे. घनसावंगी शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर जिल्ह्यातील बुलडाणा दोन, बीड येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या ७६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील काहींवर अलगीकरणात, तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ३१०वर गेली असून, त्यातील ११७१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हजार ६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, अंबड शहरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील संस्‍थात्‍मक अलगीकरणात १३ जणांवर उपचार केले जात आहेत.

सहा तालुके निरंक

जिल्ह्यातील आठपैकी जालना आणि घनसावंगी तालुक्यात रविवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर मंठा, परतूर, अंबड, बदनापूर व जाफराबाद या सहा तालुक्यांत दिवसभरात एकही रुग्ण आढळून आला नाही. रुग्णांची संख्या घटली असली तरी नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.