शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अंतर्गत पाणीपुरवठा योजना : शंभर कोटींच्या बिलामुळे कंत्राटदाराचं चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST

त्यानुसार जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या मुद्याला आ. कैलास गोरंट्याल यांनी यात लक्ष घालून ही योजना प्रत्यक्ष ...

त्यानुसार जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या मुद्याला आ. कैलास गोरंट्याल यांनी यात लक्ष घालून ही योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी जिवाचे रान केले, तसेच या योजनेसाठी ते काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांनी त्यावेळी स्वपक्षाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून या योजनेसाठी विशेष निधी म्हणजेच जवळपास २५० कोटी मंजूर केले. ही योजना व्हावी म्हणून त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावेळीदेखील जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे हेच होते. या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी मिळून ही योजना पूर्ण केली. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याच हस्ते या योजनेचा थाटात शुभारंभ करून आ. कैलास गोरंट्याल यांनी स्वप्नपूर्ती केली होती.

हे सर्व खरे असले तरी त्यावेळी जालन्याच्या वेशीवर आलेले पाणी जालन्यातील विविध भागांत समप्रमाणात मिळावे म्हणून अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी केंद्र सरकारच्या नगरोत्थान निधीतून जवळपास १३२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यासाठी त्यावेळी खासदार असलेले आणि आज केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांची मोठी मदत झाल्याचे सांगण्यात आले.

चौकट

नऊपैकी आठ जलकुंभांचे काम पूर्ण

अंतर्गत जलवाहिनी अंथरण्यासाठी ज्या एजन्सीला काम दिले होते त्या कंत्राटदाराने शहरात विविध भागांत जलवाहिनी अंथरली आहे, तसेच नऊ जलकुंभ उभारण्याचे या योजनेत ठरले होते. त्यातील आठ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. आता केवळ एक जलकुंभ पूर्ण झाल्यावर या योजनेची हायड्रोलिक टेस्ट घेण्यात येणार आहे. या कामासाठी आतापर्यंत कंत्राटदारास १०४ कोटी रुपयांचे बिल दिले असल्याचे सांगण्यात येते.