शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:30 IST

गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.हा संप मागे घ्यावा म्हणून मध्यस्थी करण्यात येत आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन संप मागे घेण्याची मागणी केली. असे असताना बँकेच्या अध्यक्षांनी भेट का दिली नाही, असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला आहे.ऐन दुष्काळात अनुदान व पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांना संपामुळे त्रास सहन करावा लागत आहे. न्याय व हक्काच्या मागण्यासाठी बँक व व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने को-आॅपरेटीव्ह बँक एम्लाईज युनियनच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह ६४ शाखांचे १८१ कर्मचारी ११ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत.सन २०१० पासून स्थगित असलेला महागाई भत्ता प्रचलित दराने शंभर टक्के अदा करावा या व इतर मागण्या १५ दिवसात मान्य न केल्यास बेमुदत संपाबाबत कळविण्यात आले होते. तरी देखील बँक व्यवस्थापनाने कोणताही निर्णय न घेतल्याने संप करण्यात येत आहे. २००७ मध्ये न्यायालयाने महागाई भत्ता देण्याबाबत निकालही दिला होता. मात्र, या निकालाकडे बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अडीच ते तीन कोटी रुपये जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा भत्ता थकीत आहे. तसेच बीड, औरंगाबाद, परभणी येथील शाखेतील कर्मचा-यांना हा भत्ता मिळत असून, केवळ जालना जिल्ह्यातील कर्मचा-यांवरच अन्याय होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात जास्त शेतक-यांचे या बँकेत खाते आहे. त्यामुळे याच बँकेत शेतक-यांना मिळणारे अनुदान वर्ग केले जाते, मात्र, बँकेच्या संपामुळे शेतक-यांच्या अनुदानाच्या याद्या व धनादेश तहसील कार्यालयात पडून आहेत. दरम्यान या संदर्भात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, कर्मचा-यांच्या मागणीवर यशस्वी तोडगा संचालकांच्या बैठकीत निघेल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Strikeसंपbankबँक