शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:30 IST

गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत.हा संप मागे घ्यावा म्हणून मध्यस्थी करण्यात येत आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन संप मागे घेण्याची मागणी केली. असे असताना बँकेच्या अध्यक्षांनी भेट का दिली नाही, असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला आहे.ऐन दुष्काळात अनुदान व पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांना संपामुळे त्रास सहन करावा लागत आहे. न्याय व हक्काच्या मागण्यासाठी बँक व व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने को-आॅपरेटीव्ह बँक एम्लाईज युनियनच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह ६४ शाखांचे १८१ कर्मचारी ११ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत.सन २०१० पासून स्थगित असलेला महागाई भत्ता प्रचलित दराने शंभर टक्के अदा करावा या व इतर मागण्या १५ दिवसात मान्य न केल्यास बेमुदत संपाबाबत कळविण्यात आले होते. तरी देखील बँक व्यवस्थापनाने कोणताही निर्णय न घेतल्याने संप करण्यात येत आहे. २००७ मध्ये न्यायालयाने महागाई भत्ता देण्याबाबत निकालही दिला होता. मात्र, या निकालाकडे बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अडीच ते तीन कोटी रुपये जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा भत्ता थकीत आहे. तसेच बीड, औरंगाबाद, परभणी येथील शाखेतील कर्मचा-यांना हा भत्ता मिळत असून, केवळ जालना जिल्ह्यातील कर्मचा-यांवरच अन्याय होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वात जास्त शेतक-यांचे या बँकेत खाते आहे. त्यामुळे याच बँकेत शेतक-यांना मिळणारे अनुदान वर्ग केले जाते, मात्र, बँकेच्या संपामुळे शेतक-यांच्या अनुदानाच्या याद्या व धनादेश तहसील कार्यालयात पडून आहेत. दरम्यान या संदर्भात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, कर्मचा-यांच्या मागणीवर यशस्वी तोडगा संचालकांच्या बैठकीत निघेल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Strikeसंपbankबँक