शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

एसआरपीएफ कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST

जालना : एसआरपीएफ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पूर्वीप्रमाणेच कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधिमंडळ आश्‍वासन ...

जालना : एसआरपीएफ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पूर्वीप्रमाणेच कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधिमंडळ आश्‍वासन समितीचे प्रमुख आमदार कैलास गोरंट्याल यांनी बुधवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत सकारात्मक विचार करून मंत्रिडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात येइल, असे आश्‍वासन देशमुख यांनी दिले आहे.

एसआरपीएफ ग्रुप ही राज्यात सातत्याने कार्यरत आहेत. नियमित पोलीस जवानांसोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ग्रुपमधील जवान नेहमीच आघाडीवर असतात. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या नियमांत पूर्वी दहा वर्षांच्या कार्यकालाची मर्यादा होती. मात्र, मागील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी नियमांत बदल करून हा कार्यकाळ पंधरा वर्षांचा केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर एसआरपीएफ ग्रुपमधील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन बदल्यांची कार्यकालाची मर्यादा पूर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार गोरंट्याल यांनी केली आहे.

सकारात्मक प्रतिसाद

आमदार गोरंट्याल यांच्याशी झालेल्या चर्चेत गृहमंत्री देशमुख यांनी बदल्यांच्या कार्यकालाची मर्यादा पूर्वीप्रमाणेच ठेवण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेऊ. लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडून त्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री देशमुख यांनी दिल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले.