शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त गावांची सदाभाऊ खोत यांच्याकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:59 IST

बोंडअळीचा हल्ला हा चिंतेचा विषय आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष घालून शेतकºयांना हवी ती मदत करण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी बदनापूर येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : जिल्ह्यातील बोंडअळीचा हल्ला हा चिंतेचा विषय आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष घालून शेतकºयांना हवी ती मदत करण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी बदनापूर येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.ही बैठक सायंकाळी कृषी महाविद्यालया पार पडली. यावेळी आ. नारायण कुचे, लक्ष्मण मोहिते, गजानन राजबिडे, जिल्हा अधीक्षक व्ही.एस. माईनकर आदींची उपस्थिती होती. राज्यमंत्री खोत यांनी प्रारंंभी शेलगाव येथील शेतकरी हरिभाऊ अंभोरे यांच्या शेतात जाऊन पिकावर प्रादुर्भाव झालेल्या बोंडअळीची पहाणी करुन कापसाची लागवड कधी करण्यात आली होती. बोंडअळीच्या प्रादुभार्वापासून वाचण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आदींची माहिती जाणून घेत मात्रेवाडी येथील शेतकरी शिवाजी रामराव महाडीक यांच्या शेतात जाऊन तेथील कापूस पिकाची पहाणी केली.यावेळी राज्यमंत्री खोत म्हणाले की, जालना जिल्ह्यात ११३ गावात २० हजार २०० हेक्टर क्षेत्राला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बोंडअळीच्या प्रादुभार्वाची कारणे शोधण्यात आली असून, यावर उपाययोजना करण्यात येत आहे. शेतक-याना मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे उपलब्ध करुन देण्याबरोबरच लिंबोळी अर्क, किटकनाशकेही अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पेरणीपूर्वी राज्यात शेतकरी संवाद अभियान राबविण्यात आल्याची माहिती देत या अभियानाच्या माध्यमातून शेतक-यांनी कोणत्या कंपनीचे बियाणे वापरले आहे, पेरणी केव्हा केली आहे व कोणती काळजी घेतली आहे ही माहिती सदरील अभियानादरम्यान कृषी अधिका-यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन घेतली आहे.

टॅग्स :cottonकापूसSadabhau Khotसदाभाउ खोत