शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नुकसानीची पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST

अंबड, वडीगोद्री : अंबड तालुक्यात शनिवारच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी विजय ...

अंबड, वडीगोद्री : अंबड तालुक्यात शनिवारच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी रविवारी केली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही टोपे यांनी या वेळी दिली.

या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार विद्याचरण कडवकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब कणके, संजय गांधी निराधारचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब नरवडे, सहदेव भारती, दत्ता केजभट, अंगद काळे, संजय कणके, महादेव तांबडे, गजानन चौधरी, अर्जुन चौधरी, गोवर्धन तांबडे, विठ्ठल झिजुर्डे, विश्वंबर गारुळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

अंबड तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पिकांचे नुकसान झाले असून, मूग, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच उसाचे पीक आडवे झाले आहे. काही ठिकाणी रस्ते, पूल तसेच जनावरे वाहून गेली आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार या अतिवृष्टीमुळे ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगत झालेल्या नुकसानीची माहिती मंत्रिमंडळासमोर ठेवून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी या वेळी सांगितले.

टोपे यांनी पाथरवाला बुद्रूक, राजेश नगर, महाकाळा, बळेगाव, साष्ठ पिंपळगाव, दह्याला, भांबेरी, धाकलगाव, वडीगोद्री, चंदनापुरी खुर्द आदी ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.