शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

नुकसानीची पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST

अंबड, वडीगोद्री : अंबड तालुक्यात शनिवारच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी विजय ...

अंबड, वडीगोद्री : अंबड तालुक्यात शनिवारच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी रविवारी केली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही टोपे यांनी या वेळी दिली.

या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार विद्याचरण कडवकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब कणके, संजय गांधी निराधारचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब नरवडे, सहदेव भारती, दत्ता केजभट, अंगद काळे, संजय कणके, महादेव तांबडे, गजानन चौधरी, अर्जुन चौधरी, गोवर्धन तांबडे, विठ्ठल झिजुर्डे, विश्वंबर गारुळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

अंबड तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पिकांचे नुकसान झाले असून, मूग, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच उसाचे पीक आडवे झाले आहे. काही ठिकाणी रस्ते, पूल तसेच जनावरे वाहून गेली आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार या अतिवृष्टीमुळे ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगत झालेल्या नुकसानीची माहिती मंत्रिमंडळासमोर ठेवून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी या वेळी सांगितले.

टोपे यांनी पाथरवाला बुद्रूक, राजेश नगर, महाकाळा, बळेगाव, साष्ठ पिंपळगाव, दह्याला, भांबेरी, धाकलगाव, वडीगोद्री, चंदनापुरी खुर्द आदी ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.