शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

केंद्रीय पथकाकडून २६ गावांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:04 IST

देशभरातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या बाबतीत गुणांकन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने १४ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची केंद्राच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत असून, हे पथक जिल्ह्यातील २६ गावांची पाहाणी करत आहे.

ठळक मुद्देआॅन द स्पॉट तपासणी । तीन जणांचे पथक जालना जिल्ह्यात

जालना : देशभरातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या बाबतीत गुणांकन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने १४ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची केंद्राच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत असून, हे पथक जिल्ह्यातील २६ गावांची पाहाणी करत आहे. या २६ गावातील स्वच्छतेच्या कामांची पाहणी करून स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये झालेल्या जाणीवजागृतीचीही माहिती घेत आहे.शहराच्या ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या धर्तीवर ग्रामीण भागात हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेत त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. अभियानात गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची निरीक्षणे; तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार घेण्यात येणार आहेत. देशभरात हे सर्वेक्षण होणार असून, सर्वेक्षणासाठी ग्रामपंचायतीची निवड ‘नमुना निवड पध्दतीने’ सर्वेक्षण करणाºया संस्थेकडून करण्यात आली आहे.ही संस्था ग्रामस्थांना आॅनलाइन व प्रत्यक्ष सहभागी करुन घेऊन गावपातळीवर जाऊन सरपंच, ग्रामसवेक, स्वच्छतागृह, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, व शिक्षकांच्या मुलाखती घेत आहे.याच्या विविध कामांसाठी गुण असून, एकूण शंभर गुणांसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी ऐनवेळी २६ गावांची निवड करण्यात आली आली आहे. यातील अबंड, भोकरदन व जालना तालुक्यातील काही गावांची पाहणी केंद्राच्या पथकाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक जिल्ह्यात दखल झाले असून, हे पथक २६ गावांची पाहणी करीत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली. एकूणच या पाहणीतून शौचालय अनुदान वाटपातील निधीचीही झाडाझडती घेतली जाणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान