शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

ओबीसी समाजावर भाजपकडून अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:10 IST

ओबीसींकडून मते मिळवायची आणि त्यांच्यावरच अन्याय करायचा, ही भाजपची कूटनीती असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

घनसावंगी: ओबीसींकडून मते मिळवायची आणि त्यांच्यावरच अन्याय करायचा, ही भाजपची कूटनीती असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.माजी मंत्री आ. राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी घनसावंगी येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात ते बोलते होते. आ. पंकज भुजबळ, आ.राजेश टोपे, आ. रामराव वडकुते, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, उत्तम पवार, संजय काळबंडे, सभापती रघुनाथ तौर, सभापती मंजुषा कोल्हे, नगराध्यक्षा योजना देशमुख, जयमंगल जाधव, संभाजी देशमुख, बाळासाहेब जाधव, भास्कर गाढवे, काशीनाथ मते, पंडित धाडगे, नंदकुमार देशमुख, शाम मुकणे, तात्यासाहेब मुकणे, रामदास घोगरे, कल्याण सपाटे, सुदामराव मुकणे, तात्यासाहेब चिमणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.धनंजय मुंडे म्हणाले की, भाजपने नेहमीच ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. ओबीसी महामंडळ फक्त नावालाच आहे. साधा नवीन ओबीसी मंत्रीही सरकारकडून देण्यात आला नाही.भाजपामध्ये ओबीसी नेते आज कुठेच दिसत नाहीत. जो न्याय कारवाई करताना खडसे यांना लावला, त्या न्यायाने प्रकाश मेहता यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला. मराठा आरक्षण शांत करण्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन शिवस्मारकाचे फक्त भूमिपूजन केले. तर विद्यापीठाला नाव देऊन धनगर आरक्षणाच्या विषयाला बगल दिली. ओबीसी सेलेचे बाळबुधे म्हणाले, की शरद पवार यांनी सर्व जातींना मानाचे स्थान दिले. त्यामुळेच राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. पंतप्रधानांनी ओबीसींना फक्त प्रलोभने दिली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहेत.येणा-या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले तरच ओबीसींचे उत्थान होईल, असा सूर मेळाव्यात उमटला.--------------