शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

गावाच्या स्वच्छतेसाठी महिला सरपंचांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST

पापळच्या सरपंच अश्विनी जाधव यांचा उपक्रम टेंभुर्णी : केवळ स्वच्छता अभियानावर व्याख्याने आणि भाषणे दिल्याने हे अभियान यशस्वी होणार ...

पापळच्या सरपंच अश्विनी जाधव यांचा उपक्रम

टेंभुर्णी : केवळ स्वच्छता अभियानावर व्याख्याने आणि भाषणे दिल्याने हे अभियान यशस्वी होणार नाही, तर यासाठी ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे स्वत: कृती करण्याची गरज आहे. आपल्या गावच्या स्वच्छतेचा विडा अशाच एका महिला सरपंचाने उचलला आहे.

जाफराबाद तालुक्यातील पापळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी मनोहर जाधव या दर महिन्याला गावाच्या स्वच्छतेसाठी स्वत:चा काही वेळ देतात. केवळ आदेशच देत नाहीत, तर कधी खराटा तर कधी फावडे हातात घेऊन स्वत: गावाची स्वच्छता करतात. मग नाल्यांतील घाण काढायलाही त्यांना कसलाच कमीपणा वाटत नाही.

एरवी महिला पदाधिकाऱ्यांचा राजकारणातील सहभाग केवळ कागदोपत्रीच राहत असला तरी कार्यालयीन कामांसह गावातील प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारी ही सरपंच महिला सध्या राजकारणात काम करणाऱ्या महिलांसाठी एक आदर्श ठरू पाहत आहे. पापळ या गावात महिला सरपंच अश्विनी जाधव यांच्या पुढाकाराने दर महिन्याला स्वच्छता अभियान राबविले जाते. यात सरपंच जाधव स्वत: स्वच्छतेसाठी सर्वांच्या पुढे असतात. स्वत: सरपंच काम करीत असल्याने गावातील इतर ग्रामस्थही हिरीरीने आपापल्या घरासमोरील स्वच्छता करण्यासाठी पुढे येतात.

कोट

स्वच्छतेचे पुजारी असलेल्या संत गाडगेबाबांसारख्या संतांनी ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे स्वत: हातात खराटा घेऊन गावची-गावे स्वच्छ केली. प्रत्येक माणसाने जर आपल्यापासून स्वच्छतेची सुरुवात केली, तर गाव स्वच्छ होण्यास वेळ लागत नाही. माझ्या गावात दर १५ दिवसांनी आम्ही नाल्यांची सफाई करतो. आमच्या गावातील सर्वच ग्रामस्थ गावच्या स्वच्छतेप्रती जागरूक असल्याने गाव नेहमीकरता स्वच्छ व सुंदर राहते.

अश्विनी जाधव, सरपंच, पापळ