शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गावाच्या स्वच्छतेसाठी महिला सरपंचांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST

पापळच्या सरपंच अश्विनी जाधव यांचा उपक्रम टेंभुर्णी : केवळ स्वच्छता अभियानावर व्याख्याने आणि भाषणे दिल्याने हे अभियान यशस्वी होणार ...

पापळच्या सरपंच अश्विनी जाधव यांचा उपक्रम

टेंभुर्णी : केवळ स्वच्छता अभियानावर व्याख्याने आणि भाषणे दिल्याने हे अभियान यशस्वी होणार नाही, तर यासाठी ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे स्वत: कृती करण्याची गरज आहे. आपल्या गावच्या स्वच्छतेचा विडा अशाच एका महिला सरपंचाने उचलला आहे.

जाफराबाद तालुक्यातील पापळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी मनोहर जाधव या दर महिन्याला गावाच्या स्वच्छतेसाठी स्वत:चा काही वेळ देतात. केवळ आदेशच देत नाहीत, तर कधी खराटा तर कधी फावडे हातात घेऊन स्वत: गावाची स्वच्छता करतात. मग नाल्यांतील घाण काढायलाही त्यांना कसलाच कमीपणा वाटत नाही.

एरवी महिला पदाधिकाऱ्यांचा राजकारणातील सहभाग केवळ कागदोपत्रीच राहत असला तरी कार्यालयीन कामांसह गावातील प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारी ही सरपंच महिला सध्या राजकारणात काम करणाऱ्या महिलांसाठी एक आदर्श ठरू पाहत आहे. पापळ या गावात महिला सरपंच अश्विनी जाधव यांच्या पुढाकाराने दर महिन्याला स्वच्छता अभियान राबविले जाते. यात सरपंच जाधव स्वत: स्वच्छतेसाठी सर्वांच्या पुढे असतात. स्वत: सरपंच काम करीत असल्याने गावातील इतर ग्रामस्थही हिरीरीने आपापल्या घरासमोरील स्वच्छता करण्यासाठी पुढे येतात.

कोट

स्वच्छतेचे पुजारी असलेल्या संत गाडगेबाबांसारख्या संतांनी ‘आधी केले, मग सांगितले’ याप्रमाणे स्वत: हातात खराटा घेऊन गावची-गावे स्वच्छ केली. प्रत्येक माणसाने जर आपल्यापासून स्वच्छतेची सुरुवात केली, तर गाव स्वच्छ होण्यास वेळ लागत नाही. माझ्या गावात दर १५ दिवसांनी आम्ही नाल्यांची सफाई करतो. आमच्या गावातील सर्वच ग्रामस्थ गावच्या स्वच्छतेप्रती जागरूक असल्याने गाव नेहमीकरता स्वच्छ व सुंदर राहते.

अश्विनी जाधव, सरपंच, पापळ