शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तेलाच्या मागणीत वाढ; जिल्ह्यात करडई, जवसासह इतर तेलबियांच्या पेऱ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST

जालना : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात तेलबियांच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी रबी हंगामात केवळ ४८ हेक्टरवर ...

जालना : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात तेलबियांच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी रबी हंगामात केवळ ४८ हेक्टरवर असलेले तेलबियांचे क्षेत्र यंदा १ हजार ३६ हेक्टरहून अधिक झाले आहे. यात करडईचा पेरा २९२.०९, तर जवस १०३.०६ हेक्टरवर आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा १ लाख ३८ हजार ६४ हेक्टरवर होता. भुईमूग १,४२७, तीळ १२६, जवस ११, सूर्यफूल २४.०८ व इतर तेलबियांचे क्षेत्र १८ हेक्टरवर होते. रबीत केवळ ४१ हेक्टरवर तेलबियांचा पेरा झाला होता, तर उन्हाळी हंगामात भुईमूग २,०१८.९, सूर्यफूल ३०, तीळ ९ व इतर १४, असा एकूण १ लाख ४१ हजार ७८२ हेक्टरवर तेलबियांचा पेरा झाला होता. एकूणच गतवर्षी खरीप, रबी व उन्हाळी या तीन हंगामांमध्ये तेलबियांचे पीक घेऊनही यंदा खरीप व रबी या दोन हंगामांमध्येच त्यात ६,२०८ हेक्टरवर वाढ झाली आहे. यंदा रबी हंगामात करडई व जवस यांचा पेरा वाढावा, यासाठी मध्यंतरी कृषी विभागाच्या आत्माच्या वतीने मोहीम राबविण्यात आली होती. यात प्रत्येक तालुकानिहाय २५ शेतकऱ्यांची करडई व २५ शेतकऱ्यांची जवस पीक लागवडीसाठी निवड करून त्यांना प्रत्येकी करडईचे पाच किलो, तर जवसाचे चार किलो बियाणे पेरणीसाठी मोफत देण्यात आले होते.

कऱ्हाळ पीक हद्दपारीच्या मार्गावर

जिल्ह्यातून कऱ्हाळ पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. यंदा खरीप हंगामात केवळ ६ हेक्टरवर कऱ्हाळाचे पीक घेण्यात आलेले आहे. यापाठोपाठ १० हेक्टरवर सूर्यफूल, तर १५७ हेक्टरवर तिळाचे पीक घेण्यात आले आहे. सर्वांत जास्त १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता; परंतु संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनवर केलेला खर्चही वसूल झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा मनाशी धरून पिकांवर मोठा खर्च केलेला आहे.

कोट

जालना तालुक्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी यंदा तेलबियांची पिके घ्यावीत, यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना तेलबियांच्या पिकांचा होत असलेला फायदा सांगून पिके घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाल्याने तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

-अजय सुखदेवे,

मंडळ कृषी अधिकारी, गोलापांगरी

इतर पिकांसोबत खरीप व रबी हंगामात आम्ही काही प्रमाणात तेलबियांची पिके घेतो. तेलबियांची पिके घेतलेल्या जमिनीवर इतर पिके चांगली येतात. त्यामुळे आम्ही दरवर्षी प्राधान्याने कमी- अधिक प्रमाणात तेलबियांचे पिके घेतो; परंतु ही पिके घेताना मिश्र पद्धतीने पिके घेण्यात भर दिला जातो. जेणेकरून ज्वारी पिकात काही प्रमाणात जवस व करडईचे उत्पादन घेतले जाते.

-संगाधर सांगोळे, शेतकरी