शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

तेलाच्या मागणीत वाढ; जिल्ह्यात करडई, जवसासह इतर तेलबियांच्या पेऱ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST

जालना : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात तेलबियांच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी रबी हंगामात केवळ ४८ हेक्टरवर ...

जालना : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात तेलबियांच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी रबी हंगामात केवळ ४८ हेक्टरवर असलेले तेलबियांचे क्षेत्र यंदा १ हजार ३६ हेक्टरहून अधिक झाले आहे. यात करडईचा पेरा २९२.०९, तर जवस १०३.०६ हेक्टरवर आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा १ लाख ३८ हजार ६४ हेक्टरवर होता. भुईमूग १,४२७, तीळ १२६, जवस ११, सूर्यफूल २४.०८ व इतर तेलबियांचे क्षेत्र १८ हेक्टरवर होते. रबीत केवळ ४१ हेक्टरवर तेलबियांचा पेरा झाला होता, तर उन्हाळी हंगामात भुईमूग २,०१८.९, सूर्यफूल ३०, तीळ ९ व इतर १४, असा एकूण १ लाख ४१ हजार ७८२ हेक्टरवर तेलबियांचा पेरा झाला होता. एकूणच गतवर्षी खरीप, रबी व उन्हाळी या तीन हंगामांमध्ये तेलबियांचे पीक घेऊनही यंदा खरीप व रबी या दोन हंगामांमध्येच त्यात ६,२०८ हेक्टरवर वाढ झाली आहे. यंदा रबी हंगामात करडई व जवस यांचा पेरा वाढावा, यासाठी मध्यंतरी कृषी विभागाच्या आत्माच्या वतीने मोहीम राबविण्यात आली होती. यात प्रत्येक तालुकानिहाय २५ शेतकऱ्यांची करडई व २५ शेतकऱ्यांची जवस पीक लागवडीसाठी निवड करून त्यांना प्रत्येकी करडईचे पाच किलो, तर जवसाचे चार किलो बियाणे पेरणीसाठी मोफत देण्यात आले होते.

कऱ्हाळ पीक हद्दपारीच्या मार्गावर

जिल्ह्यातून कऱ्हाळ पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. यंदा खरीप हंगामात केवळ ६ हेक्टरवर कऱ्हाळाचे पीक घेण्यात आलेले आहे. यापाठोपाठ १० हेक्टरवर सूर्यफूल, तर १५७ हेक्टरवर तिळाचे पीक घेण्यात आले आहे. सर्वांत जास्त १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता; परंतु संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनवर केलेला खर्चही वसूल झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा मनाशी धरून पिकांवर मोठा खर्च केलेला आहे.

कोट

जालना तालुक्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी यंदा तेलबियांची पिके घ्यावीत, यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना तेलबियांच्या पिकांचा होत असलेला फायदा सांगून पिके घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाल्याने तेलबियांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

-अजय सुखदेवे,

मंडळ कृषी अधिकारी, गोलापांगरी

इतर पिकांसोबत खरीप व रबी हंगामात आम्ही काही प्रमाणात तेलबियांची पिके घेतो. तेलबियांची पिके घेतलेल्या जमिनीवर इतर पिके चांगली येतात. त्यामुळे आम्ही दरवर्षी प्राधान्याने कमी- अधिक प्रमाणात तेलबियांचे पिके घेतो; परंतु ही पिके घेताना मिश्र पद्धतीने पिके घेण्यात भर दिला जातो. जेणेकरून ज्वारी पिकात काही प्रमाणात जवस व करडईचे उत्पादन घेतले जाते.

-संगाधर सांगोळे, शेतकरी