शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

कोरोना रुग्णांत वाढ; एसटीची प्रवासी संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

जालना जिल्ह्यात कोरोनाच्या अगोदर दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी एसटी बसने प्रवास करीत होते. त्यानंतर शासनाने लॉकडाऊन केल्याने ...

जालना जिल्ह्यात कोरोनाच्या अगोदर दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी एसटी बसने प्रवास करीत होते. त्यानंतर शासनाने लॉकडाऊन केल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली. लॉकडाऊनमुळे सर्वच बसेस बंद होत्या. याचा मोठा फटका एसटी महामंडळाला सहन करावा लागला. काही दिवसांनी कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल केले. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात दररोज केवळ ५० हजार लोक एसटीने प्रवास करीत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने यात आणखी घट झाली झाली आहे. आता दररोज ३९ ते ४१ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. त्यातच वाढलेली रुग्णसंख्या व बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी यामुळे लॉकडाऊनच्या चर्चेला उधाण आले आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास एसटी महामंडळाला मोठे नुकसान होणार आहे.

जालना जिल्ह्यात चार आगार आहेत. यात जाफराबाद, परतूर, अंबड व जालना यांचा समावेश होतोे. जिल्ह्यातून दररोज शेकडो बसेस ये-जा करतात. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने प्रवाशांची संख्याही घटली आहे.

पूर्ण मार्गावर निम्मे प्रवासी

जिल्ह्यातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. बहुतांश लोक बसनेच प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. यातून महामंडळाला चांगले उत्पन्नदेखील मिळते. परंतु, सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यामुळे पूर्ण मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. एरवी एका बसमध्ये ३२ जण प्रवास जातात. आता केवळ १० ते १५ प्रवासी जात असल्याचे सांगण्यात आले.

११ मार्गावर एसटी बंदच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जवळपास २०० बसेस बंद होत्या. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १९९ बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु, अद्यापही ११ मार्गावरील बसेस बंद आहेत. दरम्यान, शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. आता रुग्णसंख्या वाढल्याने प्रवासी संख्या पुन्हा घटली आहे.

ना मास्क ना डिस्टन्सिंग

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शासनाने प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. असे असताना प्रवाशांकडून नियमांचे पालन केले जात नाही. बहुतांश प्रवासी ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.