शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
3
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
4
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
5
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
6
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
7
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
8
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
9
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
10
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
11
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
12
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
13
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
14
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
15
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
16
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
17
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
18
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
19
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
20
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई

समन्वयाअभावी पंचनामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:40 IST

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे

जालना : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचा-यांमधील समन्वयाच्या अभावामुळे संयुक्त पंचनाम्याचे काम गुरुवारी चौथ्या दिवशीही पूर्ण झाले नाही.जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे २०८ गावांमधील सुमारे ३८ हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, हरभरा, तूर या हंगामी पिकांसह द्राक्ष डाळिंब आणि मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता जालना, मंठा आणि जाफराबाद तालुक्यात अधिक आहे. जालना तालुक्यातील ६२ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. अद्याप केवळ दहा गावांमधील पंचनामे पूर्ण झाले आहे. बाधित सर्व गावांमधील पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल प्राप्त झाला नसल्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त ४५ गावांपैकी तलाठी उपलब्ध असलेल्या २३ गावांमधील पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली. अशीच स्थिती जाफराबाद तालुक्यातही आहे. जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा, देळेगव्हाण, पोखरी, सातेफळ, बुटखेडा इ. गावांमध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले. फळबागा व शेडनेटच्या नुकसानीचे पंचनामे अगोदर करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे तहसीलदार जे.डी.वळवी यांनी सांगितले. अन्य पिकांच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. घनसावंगी तालुक्यात अधिका-यांमधील असमन्वयामुळे पंचनाम्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. तहसीलदार रजेवर असून, तालुका कृषी अधिकारी एस. आर.पोटे सोमवारपासून कार्यालयातच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी शेतात येऊन पंचनामे करतील याची दोन दिवसांपासून वाट पाहत आहोत, मात्र अद्याप एकही अधिकारी व कर्मचारी शेतात फिरकला नसल्याचे मच्छिंद्र चिंचोली येथील शेतकरी नंदकिशोर घोगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त फळबागांचे पंचनामे अद्याप अपूर्णच आहेत.--------पंचनामे तातडीने पूर्ण करावेतकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभाती माणिकराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.----------गारपीट ग्रस्त भागांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. या कामात हयगय करणा-या कर्मचा-यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल.-शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना.--------------