शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाअभावी पंचनामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:40 IST

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे

जालना : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचा-यांमधील समन्वयाच्या अभावामुळे संयुक्त पंचनाम्याचे काम गुरुवारी चौथ्या दिवशीही पूर्ण झाले नाही.जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे २०८ गावांमधील सुमारे ३८ हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, हरभरा, तूर या हंगामी पिकांसह द्राक्ष डाळिंब आणि मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता जालना, मंठा आणि जाफराबाद तालुक्यात अधिक आहे. जालना तालुक्यातील ६२ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. अद्याप केवळ दहा गावांमधील पंचनामे पूर्ण झाले आहे. बाधित सर्व गावांमधील पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल प्राप्त झाला नसल्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त ४५ गावांपैकी तलाठी उपलब्ध असलेल्या २३ गावांमधील पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली. अशीच स्थिती जाफराबाद तालुक्यातही आहे. जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा, देळेगव्हाण, पोखरी, सातेफळ, बुटखेडा इ. गावांमध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले. फळबागा व शेडनेटच्या नुकसानीचे पंचनामे अगोदर करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे तहसीलदार जे.डी.वळवी यांनी सांगितले. अन्य पिकांच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. घनसावंगी तालुक्यात अधिका-यांमधील असमन्वयामुळे पंचनाम्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. तहसीलदार रजेवर असून, तालुका कृषी अधिकारी एस. आर.पोटे सोमवारपासून कार्यालयातच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी शेतात येऊन पंचनामे करतील याची दोन दिवसांपासून वाट पाहत आहोत, मात्र अद्याप एकही अधिकारी व कर्मचारी शेतात फिरकला नसल्याचे मच्छिंद्र चिंचोली येथील शेतकरी नंदकिशोर घोगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त फळबागांचे पंचनामे अद्याप अपूर्णच आहेत.--------पंचनामे तातडीने पूर्ण करावेतकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभाती माणिकराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.----------गारपीट ग्रस्त भागांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. या कामात हयगय करणा-या कर्मचा-यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल.-शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना.--------------