शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाअभावी पंचनामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:40 IST

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे

जालना : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असेल तरी जालना जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे. महसूल व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचा-यांमधील समन्वयाच्या अभावामुळे संयुक्त पंचनाम्याचे काम गुरुवारी चौथ्या दिवशीही पूर्ण झाले नाही.जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे २०८ गावांमधील सुमारे ३८ हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, हरभरा, तूर या हंगामी पिकांसह द्राक्ष डाळिंब आणि मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता जालना, मंठा आणि जाफराबाद तालुक्यात अधिक आहे. जालना तालुक्यातील ६२ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. अद्याप केवळ दहा गावांमधील पंचनामे पूर्ण झाले आहे. बाधित सर्व गावांमधील पंचनाम्यांचा एकत्रित अहवाल प्राप्त झाला नसल्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील नुकसानग्रस्त ४५ गावांपैकी तलाठी उपलब्ध असलेल्या २३ गावांमधील पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली. अशीच स्थिती जाफराबाद तालुक्यातही आहे. जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा, देळेगव्हाण, पोखरी, सातेफळ, बुटखेडा इ. गावांमध्ये गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले. फळबागा व शेडनेटच्या नुकसानीचे पंचनामे अगोदर करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे तहसीलदार जे.डी.वळवी यांनी सांगितले. अन्य पिकांच्या पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. घनसावंगी तालुक्यात अधिका-यांमधील असमन्वयामुळे पंचनाम्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. तहसीलदार रजेवर असून, तालुका कृषी अधिकारी एस. आर.पोटे सोमवारपासून कार्यालयातच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी शेतात येऊन पंचनामे करतील याची दोन दिवसांपासून वाट पाहत आहोत, मात्र अद्याप एकही अधिकारी व कर्मचारी शेतात फिरकला नसल्याचे मच्छिंद्र चिंचोली येथील शेतकरी नंदकिशोर घोगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अंबड तालुक्यातील नुकसानग्रस्त फळबागांचे पंचनामे अद्याप अपूर्णच आहेत.--------पंचनामे तातडीने पूर्ण करावेतकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभाती माणिकराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.----------गारपीट ग्रस्त भागांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. या कामात हयगय करणा-या कर्मचा-यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल.-शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना.--------------