शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

टीव्हीसमोर बसून जेवत असाल, तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

या नवीन प्रकारामुळे मुला-मुलींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. जेवणामध्ये काय वाढले आहे यापेक्षा टी.व्ही. आणि मोबाईलवर काय सुरू ...

या नवीन प्रकारामुळे मुला-मुलींच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. जेवणामध्ये काय वाढले आहे यापेक्षा टी.व्ही. आणि मोबाईलवर काय सुरू आहे, यातच ते दंग असतात. अनेकांना वारंवार सूचना देऊनही मुले ऐकत नसल्याचे दिसून येते. शेवटी कसे का होईना मुले-मुली जेवण करतात, यातच पालकांना समाधान असते.

ही बाब जवळपास सर्वच कुटुंबांमध्ये समान दिसून येते. याचे परिणाम मुलांच्या पचन शक्तीवर आणि शारीरिक वाढीवरही दिसून येत आहेत. क्षमतेपेक्षा आहार जास्त घेतला जात असल्याचे दिसून येते. त्यातच जेवण झाल्यानंतरही मैदानी खेळ आता जवळपास बंद झाले आहेत. त्यामुळे पुन्हा हातामध्ये मोबाईल अथवा टी.व्ही.चा रिमोट आपोआपच येतो. हे सर्व टाळण्यासाठी पालकांना पुढाकार घेण्याची गरज आहे.

मुलांना कसल्याही पध्दतीने समजावून सांगून जेवणाच्यावेळी टी.व्ही.समोर अथवा मोबाईलसमोर ठेवून जेवण्याचे तोटे त्यांना समजावून सांगणे काळाची गरज बनली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पोटविकाराची प्रमुख कारणे

जेवतेवेळी मोबाईल आणि टी.व्ही समोर असल्याने अनेकजण हे त्यांच्या आहाराच्या क्षमतेपेक्षा जास्तीचे जेवण करतात. यातून मुले-मुली लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यांच्यातील चंचलता हिरावली जाते. शक्यतो जेवण करतेवेळी मोबाईल, टी.व्ही न लावणे हाच एक पर्याय आहे.

घरोघरी स्मार्ट फोन उपलब्ध असल्याने ही सवय मुला-मुलींना गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये जडली आहे. त्याचे विपरित परिणाम मुलांच्या एकूणच वाढीवर दिसून येतात. या हट्टामुळे कधी कधी मुलांसोबत अनेक ठिकाणी वाद होण्याचे प्रकारही घडत आहेत.

मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जवळपास शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलेदेखील घरातच राहत आहेत. याचा परिणाम मुलांच्या भूक लागण्यावर होत आहे. अनेकजण वारंवार आग्रह करूनही जेवण करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पालक नाईलाजाने मोबाईल मुलांना देतात.

शीतल माेहिते, जालना

लहान मुलांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत टी. व्ही. आणि मोबाईल हा अत्यंत सहजपणे उपलब्ध होतो. यातून त्यांनाही वेगवेगळे कार्टून्स तसेच मालिकांची आवड निर्माण होते. जेवणावेळी विशेष करून या मालिका पाहण्यावर मुले भर देत असल्याने अडचण होत आहे.

प्रियंका भुमरे, जालना

जवळपास प्रत्येक कुटुंबातच पती-पत्नी हे नोकरी किंवा व्यवसाय करतात. त्यामुळे घरामध्ये आजी-आजोबा असतात. आजी-आजोबांनी अनेकवेळा आग्रह करूनही मुले-मुली टीव्हीसमोरून हटत नाहीत. हे वास्तव असून, मोबाईलचीदेखील अशीच अवस्था झाली आहे.

अश्विनी पाटील, जालना

अनेक घरांमध्ये पूर्वी सर्व परिवार हा एकत्रितपणे किमान सायंकाळचे जेवण करत असत. आता धावत्या व्यापामुळे परिवारातील सर्व सदस्य क्वचितच एकत्रित येतात. त्यामुळे मुलांनादेखील जेवणाच्यावेळी टी.व्ही. लावण्याची सवय जडली आहे. ती दूर करणे मोठे आव्हान आहे.

डॉ. एस. के. मोरे, होमिओपॅथी तज्ज्ञ

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन होते. या लॉकडाऊनच्या काळात मुलांना मैदान, शाळांमध्ये जो व्यायाम होत होता, तो व्यायाम बंद झाला. त्याचा परिणाम मुलांची भूक मंदावणाऱ्यावर हाेतो. यामुळे कुठल्याही स्थितीत मुलांनी टी. व्ही. अथवा मोबाईल पाहू नये.

डॉ. सादत अली खान, जालना

टी. व्ही. आणि मोबाईल या वस्तू मनोरंजन आणि संपर्काचे साधन म्हणून ओळखल्या जातात. परंतु, सहज उपलब्ध होणारे इंटरनेट आणि मोबाईल यामुळे मुलांना आपोआपच त्यातून सहज वेगवेगळी कार्टून्स आणि मनोरंजनाचे कार्यक्रम उपलब्ध होतात. हे टाळल्यास आरोग्य चांगले राहील.

डॉ. संजय राख, सर्जन