शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

वेळीच उपचार केल्यास थायरॉईडपासूनचे धोके टाळणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

जालना : मानवी शरिरात ग्रंथींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. एकूणच शरिराची वाढ, त्यातील ऊर्जा तसेच सुदृढ आरोग्यात ग्रंथींचा सिंहाचा ...

जालना : मानवी शरिरात ग्रंथींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. एकूणच शरिराची वाढ, त्यातील ऊर्जा तसेच सुदृढ आरोग्यात ग्रंथींचा सिंहाचा वाटा असतो. परंतु, याच ग्रंथींचे प्रमाण हे क्षमतेपक्षा अधिक वाढले आणि कमी झाले तरी मानवी आरोग्य धोक्यात येते. परंतु, थायरॉईड हा आजार जीवघेणा नसून, वेळीच तज्ज्ञांकडून उपचार घेऊन नियमित औषधांचे सेवन केल्यास यातून मुक्त होता येते, अशी माहिती थायरॉईड तथा ईएनटी तज्ज्ञ डॉ. संदीप अग्रवाल यांनी दिली. दिनांक २५ मे हा जागतिक थायरॉईड दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. यानिमित्ताने संदीप अग्रवाल यांनी या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हा आजार म्हणजे दुसरा-तिसरा काही नसून, तुमच्या गळ्याजवळील ग्रंथींमधील द्रव्याच्या प्रमाणात क्षमतेपेक्षा वाढ झाली आणि आवश्यक असलेल्या टक्क्यांपेक्षा घट झाल्यास त्याचे परिणाम हे तुमच्या शरिरावर दिसतात. थायरॉईडची लक्षणे ही चटकन लक्षात येत नाहीत. परंतु, हातावर, चेहऱ्यावर तसेच पायांवर सूज येणे, अचानकपणे केस गळती होणे, अचानक वजन वाढणे, कमी होणे ही लक्षणे असतात. विशेष करून हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

थायरॉईडवर अनेक खात्रीशीर औषधे आहेत, परंतु अनेकजण एक ते दोनवेळेस स्वत:ची तपासणी करून नंतर दिलेली औषधेही नियमितपणे घेत नाहीत. त्यामुळे हा आजार पुन्हा डोके वर काढतो. थायरॉईडचे प्रमाण अधिक वाढल्यास वंध्यत्वही येऊ शकते. त्यातच ग्रंथींमधील द्रव्यांचे प्रमाण हे कमी-अधिक झाल्यास उंची खुंटणे, बौध्दिक वाढ न होणे ही आजाराची लक्षणे आहेत. सध्या देशात हायपो थायराडीझम हा आजार सर्वसामान्य झाला आहे. त्यामुळे या आजाराविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. थायरॉईड म्हणजे मराठीतील ‘गलगंड’ असे या आजाराचे नाव आहे.

संदीप अग्रवाल यांनी कान, नाक, घशासोबतच पीएचएफ अर्थात पब्लिक हेल्थ फाऊंडेशन यासह अन्य महत्त्वाच्या संस्थांमधून थायरॉईडबद्दलचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

चौकट

देशात सहा कोटींपेक्षा अधिक रूग्ण

एकट्या भारताचा विचार केल्यास जवळपास सहा कोटींपेक्षा अधिक रूग्ण या आजाराने ग्रासले आहेत. यात विशेष करून ३० वर्षांपेक्षा अधिकचे वय असलेल्या महिलांमध्ये हा आजार चटकन बळावतो. या आजाराने महिलांमध्ये येणारी मासिक पाळी लांबणे किंवा जवळ येण्याचे प्रकार सर्रास घडतात. हा आजार मेंदूच्या गतिमानतेवरही आघात करू शकतो. परंतु, तो जीवघेणा नसल्याने नागरिकांनी याची धास्त न घेता काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी म्हणजे हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे घेण्याच्या वेळा आणि दिवस पाळलेच पाहिजेत.

- डॉ. संदीप अग्रवाल, थायरॉईड तज्ज्ञ, जालना