शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

वेळीच उपचार केल्यास थायरॉईडपासूनचे धोके टाळणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

जालना : मानवी शरिरात ग्रंथींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. एकूणच शरिराची वाढ, त्यातील ऊर्जा तसेच सुदृढ आरोग्यात ग्रंथींचा सिंहाचा ...

जालना : मानवी शरिरात ग्रंथींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. एकूणच शरिराची वाढ, त्यातील ऊर्जा तसेच सुदृढ आरोग्यात ग्रंथींचा सिंहाचा वाटा असतो. परंतु, याच ग्रंथींचे प्रमाण हे क्षमतेपक्षा अधिक वाढले आणि कमी झाले तरी मानवी आरोग्य धोक्यात येते. परंतु, थायरॉईड हा आजार जीवघेणा नसून, वेळीच तज्ज्ञांकडून उपचार घेऊन नियमित औषधांचे सेवन केल्यास यातून मुक्त होता येते, अशी माहिती थायरॉईड तथा ईएनटी तज्ज्ञ डॉ. संदीप अग्रवाल यांनी दिली. दिनांक २५ मे हा जागतिक थायरॉईड दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. यानिमित्ताने संदीप अग्रवाल यांनी या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हा आजार म्हणजे दुसरा-तिसरा काही नसून, तुमच्या गळ्याजवळील ग्रंथींमधील द्रव्याच्या प्रमाणात क्षमतेपेक्षा वाढ झाली आणि आवश्यक असलेल्या टक्क्यांपेक्षा घट झाल्यास त्याचे परिणाम हे तुमच्या शरिरावर दिसतात. थायरॉईडची लक्षणे ही चटकन लक्षात येत नाहीत. परंतु, हातावर, चेहऱ्यावर तसेच पायांवर सूज येणे, अचानकपणे केस गळती होणे, अचानक वजन वाढणे, कमी होणे ही लक्षणे असतात. विशेष करून हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

थायरॉईडवर अनेक खात्रीशीर औषधे आहेत, परंतु अनेकजण एक ते दोनवेळेस स्वत:ची तपासणी करून नंतर दिलेली औषधेही नियमितपणे घेत नाहीत. त्यामुळे हा आजार पुन्हा डोके वर काढतो. थायरॉईडचे प्रमाण अधिक वाढल्यास वंध्यत्वही येऊ शकते. त्यातच ग्रंथींमधील द्रव्यांचे प्रमाण हे कमी-अधिक झाल्यास उंची खुंटणे, बौध्दिक वाढ न होणे ही आजाराची लक्षणे आहेत. सध्या देशात हायपो थायराडीझम हा आजार सर्वसामान्य झाला आहे. त्यामुळे या आजाराविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. थायरॉईड म्हणजे मराठीतील ‘गलगंड’ असे या आजाराचे नाव आहे.

संदीप अग्रवाल यांनी कान, नाक, घशासोबतच पीएचएफ अर्थात पब्लिक हेल्थ फाऊंडेशन यासह अन्य महत्त्वाच्या संस्थांमधून थायरॉईडबद्दलचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

चौकट

देशात सहा कोटींपेक्षा अधिक रूग्ण

एकट्या भारताचा विचार केल्यास जवळपास सहा कोटींपेक्षा अधिक रूग्ण या आजाराने ग्रासले आहेत. यात विशेष करून ३० वर्षांपेक्षा अधिकचे वय असलेल्या महिलांमध्ये हा आजार चटकन बळावतो. या आजाराने महिलांमध्ये येणारी मासिक पाळी लांबणे किंवा जवळ येण्याचे प्रकार सर्रास घडतात. हा आजार मेंदूच्या गतिमानतेवरही आघात करू शकतो. परंतु, तो जीवघेणा नसल्याने नागरिकांनी याची धास्त न घेता काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी म्हणजे हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे घेण्याच्या वेळा आणि दिवस पाळलेच पाहिजेत.

- डॉ. संदीप अग्रवाल, थायरॉईड तज्ज्ञ, जालना