शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

वेळीच उपचार केल्यास थायरॉईडपासूनचे धोके टाळणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

जालना : मानवी शरिरात ग्रंथींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. एकूणच शरिराची वाढ, त्यातील ऊर्जा तसेच सुदृढ आरोग्यात ग्रंथींचा सिंहाचा ...

जालना : मानवी शरिरात ग्रंथींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. एकूणच शरिराची वाढ, त्यातील ऊर्जा तसेच सुदृढ आरोग्यात ग्रंथींचा सिंहाचा वाटा असतो. परंतु, याच ग्रंथींचे प्रमाण हे क्षमतेपक्षा अधिक वाढले आणि कमी झाले तरी मानवी आरोग्य धोक्यात येते. परंतु, थायरॉईड हा आजार जीवघेणा नसून, वेळीच तज्ज्ञांकडून उपचार घेऊन नियमित औषधांचे सेवन केल्यास यातून मुक्त होता येते, अशी माहिती थायरॉईड तथा ईएनटी तज्ज्ञ डॉ. संदीप अग्रवाल यांनी दिली. दिनांक २५ मे हा जागतिक थायरॉईड दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. यानिमित्ताने संदीप अग्रवाल यांनी या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हा आजार म्हणजे दुसरा-तिसरा काही नसून, तुमच्या गळ्याजवळील ग्रंथींमधील द्रव्याच्या प्रमाणात क्षमतेपेक्षा वाढ झाली आणि आवश्यक असलेल्या टक्क्यांपेक्षा घट झाल्यास त्याचे परिणाम हे तुमच्या शरिरावर दिसतात. थायरॉईडची लक्षणे ही चटकन लक्षात येत नाहीत. परंतु, हातावर, चेहऱ्यावर तसेच पायांवर सूज येणे, अचानकपणे केस गळती होणे, अचानक वजन वाढणे, कमी होणे ही लक्षणे असतात. विशेष करून हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

थायरॉईडवर अनेक खात्रीशीर औषधे आहेत, परंतु अनेकजण एक ते दोनवेळेस स्वत:ची तपासणी करून नंतर दिलेली औषधेही नियमितपणे घेत नाहीत. त्यामुळे हा आजार पुन्हा डोके वर काढतो. थायरॉईडचे प्रमाण अधिक वाढल्यास वंध्यत्वही येऊ शकते. त्यातच ग्रंथींमधील द्रव्यांचे प्रमाण हे कमी-अधिक झाल्यास उंची खुंटणे, बौध्दिक वाढ न होणे ही आजाराची लक्षणे आहेत. सध्या देशात हायपो थायराडीझम हा आजार सर्वसामान्य झाला आहे. त्यामुळे या आजाराविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. थायरॉईड म्हणजे मराठीतील ‘गलगंड’ असे या आजाराचे नाव आहे.

संदीप अग्रवाल यांनी कान, नाक, घशासोबतच पीएचएफ अर्थात पब्लिक हेल्थ फाऊंडेशन यासह अन्य महत्त्वाच्या संस्थांमधून थायरॉईडबद्दलचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

चौकट

देशात सहा कोटींपेक्षा अधिक रूग्ण

एकट्या भारताचा विचार केल्यास जवळपास सहा कोटींपेक्षा अधिक रूग्ण या आजाराने ग्रासले आहेत. यात विशेष करून ३० वर्षांपेक्षा अधिकचे वय असलेल्या महिलांमध्ये हा आजार चटकन बळावतो. या आजाराने महिलांमध्ये येणारी मासिक पाळी लांबणे किंवा जवळ येण्याचे प्रकार सर्रास घडतात. हा आजार मेंदूच्या गतिमानतेवरही आघात करू शकतो. परंतु, तो जीवघेणा नसल्याने नागरिकांनी याची धास्त न घेता काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी म्हणजे हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे घेण्याच्या वेळा आणि दिवस पाळलेच पाहिजेत.

- डॉ. संदीप अग्रवाल, थायरॉईड तज्ज्ञ, जालना