शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

स्वच्छता सर्वेक्षण; शहराचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:44 IST

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत मार्चअखेर देशातील चार हजार शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण केले जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाबरोबच हगणदारीमुक्तीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छतेत नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे, हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वेक्षणांतर्गत नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी स्वच्छता अ‍ॅपही उपलब्ध करून देण्यात आले होते. अ‍ॅपवर प्र्राप्त तक्रारी व उपाययोजनांमुळे जालना शहर सध्या ८८ क्रमांकार आहे. पालिकेने शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार शहरात प्रत्यक्ष काम झाले आहे, का याची तपासणी करण्यासाठी शहरात सुरू असलेल्या तपासणीचा सोमवारी सायंकाळी समोराप झाला. केंद्रीय पथकातील प्रकाश मुतळे यांनी चार दिवस शहरात फिरून कचरा डेपो निष्कासित करणे, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांचा वापर, घंटा गाड्यांद्वारे होणारे कच-याचे संकलन, व्यापारी भागात होणारी रात्रीची स्वच्छता, हगणदारीमुक्त ठिकाणे याची तपासणी केली. पालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे, माधव जामधडे यांनी मुतळे यांना सहकार्य केले.स्वच्छता सर्वेक्षणाच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. मार्चअखेर देशातील चार हजार शहरांचे मूल्यांकन झाल्यानंतर उत्कृष्ट कार्य करणा-या तीन शहरांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यातील पहिले पारितोषिक १५ कोटींचे असणार आहे.जालना नगरपालिका : तपासणीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापरशहर स्वच्छतेचे मूल्यांकन करताना अनेक भागांत जाऊन प्रत्यक्ष स्वच्छतेची छायाचित्रे प्रथमच मोबाईल अ‍ॅपमध्ये घेऊन तात्काळ पाठविण्यात आली. शहरातील नूतन वसाहत, कन्हैय्यानगर, लालबाग, इंदिरानगर, घायाळनगर इ.भागांतील नागरिकांचे प्रत्यक्ष अभिप्रायही नोंदविण्यात आले. अनेक नागरिकांनी पूर्वीपेक्षा शहर स्वच्छतेत सुधारणा झाल्याच्या प्र्रतिक्रिया तपासणीदरम्यान व्यक्त केल्या.