शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

स्वच्छता सर्वेक्षण; शहराचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:44 IST

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत मार्चअखेर देशातील चार हजार शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण केले जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाबरोबच हगणदारीमुक्तीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छतेत नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे, हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वेक्षणांतर्गत नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी स्वच्छता अ‍ॅपही उपलब्ध करून देण्यात आले होते. अ‍ॅपवर प्र्राप्त तक्रारी व उपाययोजनांमुळे जालना शहर सध्या ८८ क्रमांकार आहे. पालिकेने शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार शहरात प्रत्यक्ष काम झाले आहे, का याची तपासणी करण्यासाठी शहरात सुरू असलेल्या तपासणीचा सोमवारी सायंकाळी समोराप झाला. केंद्रीय पथकातील प्रकाश मुतळे यांनी चार दिवस शहरात फिरून कचरा डेपो निष्कासित करणे, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांचा वापर, घंटा गाड्यांद्वारे होणारे कच-याचे संकलन, व्यापारी भागात होणारी रात्रीची स्वच्छता, हगणदारीमुक्त ठिकाणे याची तपासणी केली. पालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे, माधव जामधडे यांनी मुतळे यांना सहकार्य केले.स्वच्छता सर्वेक्षणाच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. मार्चअखेर देशातील चार हजार शहरांचे मूल्यांकन झाल्यानंतर उत्कृष्ट कार्य करणा-या तीन शहरांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यातील पहिले पारितोषिक १५ कोटींचे असणार आहे.जालना नगरपालिका : तपासणीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापरशहर स्वच्छतेचे मूल्यांकन करताना अनेक भागांत जाऊन प्रत्यक्ष स्वच्छतेची छायाचित्रे प्रथमच मोबाईल अ‍ॅपमध्ये घेऊन तात्काळ पाठविण्यात आली. शहरातील नूतन वसाहत, कन्हैय्यानगर, लालबाग, इंदिरानगर, घायाळनगर इ.भागांतील नागरिकांचे प्रत्यक्ष अभिप्रायही नोंदविण्यात आले. अनेक नागरिकांनी पूर्वीपेक्षा शहर स्वच्छतेत सुधारणा झाल्याच्या प्र्रतिक्रिया तपासणीदरम्यान व्यक्त केल्या.