शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

३०% निधीसाठी लगबग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:16 IST

शासनाने कर्जमाफीच्या कारणावरून कपात केलेला ३० टक्के निधी झेडपीला पुन्हा मिळणार आहे. निधी खर्चासाठी ३१ मार्च २०१९ ची मुदत असली तरी ३१ मार्च २०१८ पर्यंत निधी मंजूर करवून घ्यावा लागणार आहे. याची लगीनघाई जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत सुरु असल्याचे दिसून येत आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाने कर्जमाफीच्या कारणावरून कपात केलेला ३० टक्के निधी झेडपीला पुन्हा मिळणार आहे. निधी खर्चासाठी ३१ मार्च २०१९ ची मुदत असली तरी ३१ मार्च २०१८ पर्यंत निधी मंजूर करवून घ्यावा लागणार आहे. याची लगीनघाई जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत सुरु असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार केला जातो. यापैकी तब्बल ७० टक्के निधी हा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील विकास कामांसाठी दिला जातो. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी जवळपास ६० कोटींचा निधी जि. प.च्या बांधकाम विभाग, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, सिंचन, पाणीपुरवठा पंचायत इ. विभागांतील कामांसाठी मंजूर करण्यात आला. याचे प्रस्ताव तयार करून याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. निधीही मंजूर झाला. दरम्यान, राज्य शासनाने शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केली. यासाठी निधी कमी पडू नये म्हणून जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर विविध विभागांना उर्वरित ७० टक्क्यांप्रमाणे निधी मंजूर झाला. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने ३० टक्के निधी कपातीचा निर्णय रद्द केला. त्यानुसार आता जिल्हा परिषदेला १८ कोटींचा निधी मिळणार आहे.यातून बांधकाम विभागातील ग्रामीण रस्ते, सिंचन विभागात कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, शिक्षण विभागामध्ये शाळा खोली बांधकाम आणि दुरुस्ती, शालेय साहित्य खरेदी, पशुसंवर्धन विभागात उपकेंद्र, केंद्राचे बांधकाम व दुरुस्ती व औषधी खरेदी, आरोग्य विभागत उपकेंद्रांची दुरुस्ती व औषधी खरेदी केली जाणार आहे. आता जिल्हा परिषदेच्या दीड पट म्हणजेच २७ कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत. याला प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली जाणार आहे. त्यानंतर निधी मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव पाठविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंजूर निधी खर्चास दोन वर्षांची मुदत असली तरी आर्थिक वर्षात निधी मंजुरी मिळविणे आवश्यक आहे. ती मिळाली नाही, तर निधी व्यपगत (लॅप्स) होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांची या निधीसाठी प्रस्ताव करण्याची लगबग सुरु आहे. आगामी पंधरा दिवसांत प्रस्ताव तयार करुन त्याला प्रशासकीय मंजुरी मिळवावी लागणार आहे. तरच हा १८ कोटींचा निधी जि. प.ला मिळून प्रस्तावित विकास कामे मार्गी लागू शकतील.