शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

माणुसकी सर्वात मोठा धर्म- भास्कर महाराज देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:08 IST

समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : गुरुपौर्णिमा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, ते व्हायलाच हवेत. सांप्रदायिक सद्भाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. माणुसकी हाच जगातला सर्वात मोठा धर्म आहे. समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले.जाफराबाद येथील श्री राधाकृष्ण नवनाथ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. भास्कर महाराज म्हणाले, अनाथ, गरजू आणि असहाय असलेल्या लोकांची सेवा करणे म्हणजे खरी मानवता आहे. मानवता सर्वात मोठा धर्म आहे. परमेश्वराने आपल्याला इतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याकरता मानवाचा जन्म दिला आहे. आई-वडिलांची सेवा करणे हे आपल्या प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे, हे प्रत्येकाने पार पाडले पाहिजे. संस्काराने जीवन महान बनू शकते म्हणून जीवनात संस्कार अतिशय महत्त्वाचा असतो.प्रारंभी भास्कर महाराजांनी त्यांचे गुरु प.पू. प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. नंतर भजन, आरती, कीर्तन झाले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती होती.गुरू आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा व प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आनंदी जीवन कसे जगावे शिकवतात. गुरू शब्दाचा अर्थच मुळात अंधार नाहीसा करणे, हा आहे. गुरू ज्ञानाचा सागर असतात. गुरूच्या कृपेनेच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ज्ञानप्राप्तीसाठी, जीवनात आत्मानंद मिळवण्यासाठी त्याला गुरूची आवश्यकता ही असतेच. गुरूशिवाय जीवन अपूर्णच आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम