शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

माणुसकी सर्वात मोठा धर्म- भास्कर महाराज देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 01:08 IST

समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : गुरुपौर्णिमा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, ते व्हायलाच हवेत. सांप्रदायिक सद्भाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. माणुसकी हाच जगातला सर्वात मोठा धर्म आहे. समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले.जाफराबाद येथील श्री राधाकृष्ण नवनाथ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. भास्कर महाराज म्हणाले, अनाथ, गरजू आणि असहाय असलेल्या लोकांची सेवा करणे म्हणजे खरी मानवता आहे. मानवता सर्वात मोठा धर्म आहे. परमेश्वराने आपल्याला इतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याकरता मानवाचा जन्म दिला आहे. आई-वडिलांची सेवा करणे हे आपल्या प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे, हे प्रत्येकाने पार पाडले पाहिजे. संस्काराने जीवन महान बनू शकते म्हणून जीवनात संस्कार अतिशय महत्त्वाचा असतो.प्रारंभी भास्कर महाराजांनी त्यांचे गुरु प.पू. प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. नंतर भजन, आरती, कीर्तन झाले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती होती.गुरू आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा व प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आनंदी जीवन कसे जगावे शिकवतात. गुरू शब्दाचा अर्थच मुळात अंधार नाहीसा करणे, हा आहे. गुरू ज्ञानाचा सागर असतात. गुरूच्या कृपेनेच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ज्ञानप्राप्तीसाठी, जीवनात आत्मानंद मिळवण्यासाठी त्याला गुरूची आवश्यकता ही असतेच. गुरूशिवाय जीवन अपूर्णच आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम