शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

जालना : अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु, अकरावीचे प्रवेश कोणत्या पद्धतीने करावयाचे याबाबत शासनाकडून ...

जालना : अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु, अकरावीचे प्रवेश कोणत्या पद्धतीने करावयाचे याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शाळा प्रशासनासह विद्यार्थी, पालकांची संभ्रमावस्था कायम आहे.

कोरोनामुळे यंदा परीक्षा न घेता मुलांच्या वार्षिक अहवालानुसार गुणदान करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश मुलांची टक्केवारी ९० च्याही पुढे गेली आहे. त्यात अकरावी प्रवेशासाठी होणारी टीईटी परीक्षाही आता रद्द करण्यात आली आहे. परंतु, दहावीच्या गुणवत्तेवर अकरावीत प्रवेश द्यायचे की इतर पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवायची ? याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीत.

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

अकरावी प्रवेश प्रक्रियेत काही महाविद्यालयातील सायन्स शाखेतील प्रवेशाचा कटऑफ ९०, तर कॉमर्सचा कटऑफ हा ८० ते ९५ असतो. परंतु, यंदा दहावीच्या गुणवत्तेवर प्रवेश प्रक्रिया देण्याचे शासनाने जाहीर केले, तर सर्वच महाविद्यालयांचा हा कटऑफ वाढणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची

टीईटी परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्ट निर्देश देणे गरजेचे आहे. शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश आल्यानंतर त्या पद्धतीने अकरावीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

- शिवशंकर घुमरे, प्राचार्य

स्पर्धा परीक्षेमध्ये व नीट परीक्षेत क्षमता विकसित करण्यासाठी सीईटी आवश्यक आहे. परंतु, शासनाने ही परीक्षा रद्द केली आहे. आता शासनाचे जे निर्देश येतील त्यानुसारच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे.

- डॉ. भारत खंदारे, प्राचार्य

विद्यार्थी चिंतेत

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यात आता सीईटी परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होईल याची चिंता कायम आहे.

- श्रीदेव अडाणी, विद्यार्थी

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचा निर्णय झाला. आम्ही त्याची तयारी केली. परंतु, ती परीक्षा रद्द झाली. आता पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

- मनोज उदेवाल, विद्यार्थी