शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

जालना : अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु, अकरावीचे प्रवेश कोणत्या पद्धतीने करावयाचे याबाबत शासनाकडून ...

जालना : अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु, अकरावीचे प्रवेश कोणत्या पद्धतीने करावयाचे याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शाळा प्रशासनासह विद्यार्थी, पालकांची संभ्रमावस्था कायम आहे.

कोरोनामुळे यंदा परीक्षा न घेता मुलांच्या वार्षिक अहवालानुसार गुणदान करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश मुलांची टक्केवारी ९० च्याही पुढे गेली आहे. त्यात अकरावी प्रवेशासाठी होणारी टीईटी परीक्षाही आता रद्द करण्यात आली आहे. परंतु, दहावीच्या गुणवत्तेवर अकरावीत प्रवेश द्यायचे की इतर पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवायची ? याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीत.

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

अकरावी प्रवेश प्रक्रियेत काही महाविद्यालयातील सायन्स शाखेतील प्रवेशाचा कटऑफ ९०, तर कॉमर्सचा कटऑफ हा ८० ते ९५ असतो. परंतु, यंदा दहावीच्या गुणवत्तेवर प्रवेश प्रक्रिया देण्याचे शासनाने जाहीर केले, तर सर्वच महाविद्यालयांचा हा कटऑफ वाढणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची

टीईटी परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे आता शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्पष्ट निर्देश देणे गरजेचे आहे. शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश आल्यानंतर त्या पद्धतीने अकरावीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

- शिवशंकर घुमरे, प्राचार्य

स्पर्धा परीक्षेमध्ये व नीट परीक्षेत क्षमता विकसित करण्यासाठी सीईटी आवश्यक आहे. परंतु, शासनाने ही परीक्षा रद्द केली आहे. आता शासनाचे जे निर्देश येतील त्यानुसारच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे.

- डॉ. भारत खंदारे, प्राचार्य

विद्यार्थी चिंतेत

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यात आता सीईटी परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होईल याची चिंता कायम आहे.

- श्रीदेव अडाणी, विद्यार्थी

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचा निर्णय झाला. आम्ही त्याची तयारी केली. परंतु, ती परीक्षा रद्द झाली. आता पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

- मनोज उदेवाल, विद्यार्थी