शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

बदनापूर तालुक्यात सवार्धिक ८७.३१ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:26 IST

ग्रामपंचायत निवडणूक; मतदानाचा टक्का वाढला जालना : जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी १,४७९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. ...

ग्रामपंचायत निवडणूक; मतदानाचा टक्का वाढला

जालना : जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी १,४७९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने मतदान केले. सकाळपासूनच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात ८२.३२ टक्के मतदान झाले. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ८७.३१ टक्के, तर सर्वांत कमी जालना तालुक्यात ७९.३५ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६५३ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. १,४७९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क व सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पहिल्या दोन तासांत ९.४७ टक्के मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत २८ टक्के मतदान झाले होते. तर साडेतीन वाजेपर्यंत ६१.५८ टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७ लाख २० हजार ०७५ मतदारांपैकी ५ लाख ९२ हजार ७८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३ लाख १४ हजार ९०३ पुरुष तर २ लाख ७७ हजार ८८२ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ८७.३१ टक्के मतदान झाले. तर जालना तालुक्यात सर्वांत कमी ७९.३५ टक्के मतदान झाले. त्यानंतर अंबड ८१.८८, घनसावंगी ८१.५६, परतूर ८४.०९, मंठा ८३.९५, भोकरदन ८२.०७, तर जाफराबाद तालुक्यात ८०.७२ टक्के मतदान झाले. ३,६५३ जागांसाठी १२३३२ उमेदवारांचे भवितव्य मतदारपेटीत बंद झाले आहे.

१८ जानेवारी रोजी फैसला

जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६५३ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. १२३३२ उमेदवारांचा भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे लक्ष सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे.

तालुकानिहाय झालेले मतदान

तालुका पुरुषमहिला

जालना ५२९२६ ४६७९२

बदनापूर ३६५१४ ३२०१६

अंबड ४७९३७ ४२५१६

घनसावंगी ३६६१९ ३२५७६

परतूर २२९८७ २०५४३

मंठा २९०८९ २५२३३

भोकरदन ७३०९९ ६४१७७

जाफराबाद १५७३२ १४०२९