शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उच्च दाब वीज ग्राहकांना दहा टक्के दरवाढीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:45 IST

वीज नियामाक आयोगाने नव्याने जाहीर केलल्या वीजदरवाढीचा मोठा फटका राज्यातील उच्चदाब वीज ग्राहकांना बसला आहे. आयोगाने एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास २१५ उच्चदाब वीज ग्राहकांना यामुळे किमान दहा कोटीचा फटका दर महिन्याला बसणार आहे.

ठळक मुद्देजालना : मंदीत असलेल्या उद्योगांना आर्थिक भूर्दंड, वीज नियमक आयोगाने दरवाढीचा पुनर्विचार करावा, २०२० नंतरचे टेरीफ दर जाहीर

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज नियामाक आयोगाने नव्याने जाहीर केलल्या वीजदरवाढीचा मोठा फटका राज्यातील उच्चदाब वीज ग्राहकांना बसला आहे. आयोगाने एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू केली आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास २१५ उच्चदाब वीज ग्राहकांना यामुळे किमान दहा कोटीचा फटका दर महिन्याला बसणार आहे.वीज नियामक आयोगाने वेळावेळी जनसुनवाणी घेऊन उद्योजक, आणि उर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना यावेळी निमंत्रीत केले होते. यावेळी उद्योजकांनी कुठलीही दरवाढ करू नये असे म्हणणे मांडले होते. परंतु, याकडे आयोगाने लक्ष दिले नसल्याचे वास्तव आहे. एक तारखेपासून लागू केलेल्या दरवाढीवरून दिसून येते.दोन वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील उच्चदाब वीज वापर ग्राहकांना प्रति युनिटप्रमाणे एक रूपयांची सवलत दिली होती.ही सवलत आता केवळ नावापुरती उरली आहे. एक सप्टेंबर पासून जी दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे पूर्वी ४.५० पैसे प्रति युनिट दर आकारले जात होते. तर आता हे दर प्रतियुनिट थेट ५. १० पैसे असे करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्याचा विचार केल्यास वीज वितरण कंपनीला या उच्चदाब वीज ग्राहकांकडून दर महिन्याला ७० कोटी रूपये मिळत असत. यात आता वाढ होऊन साधारपणे ८० कोटी रूपयांवर हे वीजबिल पोहचणार आहे.या दरवाढीचा सर्वात मोठा फटका स्टील, डाळमिल, आॅईलमिल, साखर कारखाने आदींना बसणार असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत जालना जिल्ह्याचा वीज वितरण कंपनीचा डोलारा पूर्णपणे या उच्चदाब वीज ग्राहकांकडून मिळणाऱ्या वीजबिलातून चालू आहे. घरगुती वीज वापर आणि व्यावयसायिक वीज ग्राहकांकडून दर महिन्याला संपूर्ण जिल्ह्यातून केवळ अडीच कोटी रूपये मिळतात.वीज दरवाढीचा फेरविचार करावासध्या उद्योग, व्यवसायात कमी पाऊस पडल्याने मोठी मंदी आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने ही दरवाढ केली आहे. ती दरवाढ मागे घेऊन या दरवाढीचा फेरविचार केल्यास उद्योगांना त्याचा लाभ होऊ शकतो. आम्ही नियमितपणे वीजबिल भरत असतांना आमच्यावरच ही दरवाढ लादली आहे. या सदंर्भात वीज नियामक आयोगाकडे पत्र व्यवहार करणार आहोत.- गणेश बियाणी, अध्यक्ष लघू उद्योग भारती संघटना

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण