शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

आठ महसूल मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:33 IST

जालना : जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत तब्बल ३६.६० मिमी पाऊस झाला. त्यात जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांत ...

जालना : जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत तब्बल ३६.६० मिमी पाऊस झाला. त्यात जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून, या मंडळातील खरिपातील उरल्यासुरल्या पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी होत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. उसासह फळबागांवरही या पावसाचा विपरित परिणाम झाला आहे. नुकसानीचे पंचनामे काही भागात सुरू आहेत. परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे या पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांतही दमदार पाऊस झाला तर आठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात भोकरदन तालुक्यातील केदारखेडा मंडळात ८५.३ मिमी, जाफराबाद मंडळात ८४.८ मिमी, कुंभारझरी मंडळात ८६.३ मिमी, टेंभुर्णी मंडळात ७३.३ मिमी, वरूड मंडळात ९५.८ मिमी पाऊस झाला आहे. जालना तालुक्यातील रामनगर मंडळात ६७.८ मिमी, बदनापूर मंडळात ८४.५ मिमी, रोषणगाव मंडळात ८२.८ मिमी पाऊस झाला आहे. सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सर्वच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यात १५७.९७ टक्के पाऊस

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ६०३.१० मिमी पाऊस होणे अपेक्षित असून, आजवर ९१६.१० मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या १५७.९७ टक्के पाऊस झाला आहे. याच कालावधीत गतवर्षी १४८.२७ टक्के पाऊस झाला होता. ही आकडेवारी पाहता मागील वर्षीपेक्षाही यंदा अधिक पाऊस झाल्याचे दिसत आहे.

अंबड तालुक्यात सर्वाधिक हजेरी

अंबड तालुक्यात आजवर सर्वाधिक तब्बल १८८.२३ टक्के पाऊस झाला आहे. तर जालना तालुक्यात १५२.३१ टक्के, बदनापूर तालुक्यात १४२.५३ टक्के, भोकरदन तालुक्यात १५०.०६ टक्के, जाफराबाद तालुक्यात १३४.४२ टक्के, परतूर तालुक्यात १४९.५५ टक्के, मंठा तालुक्यात १४५.७७ टक्के तर घनसावंगी तालुक्यात आजवर १६७.६२ टक्के पाऊस झाला आहे.