शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

बायकोला भेटायला जाण्यासाठी हवाय ई-पास ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

जालना : कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांच्या काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने ई-पास बंधनकारक केला ...

जालना : कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांच्या काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने ई-पास बंधनकारक केला आहे. मात्र, ई-पास घेताना काही नागरिक अफलातून कारणे देत आहेत. मला माझ्या बायकोला भेटायला जायचं आहे, यासाठी मला ई-पास हवाय, मला लग्नाला जायचं आहे आदी कारणे ई-पास घेताना दिली जात आहेत.

जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. अशीच स्थिती राज्यभरात होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते. एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत होते, तर दुसरीकडे अंत्यसंस्कार, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने ई-पास देण्यास सुरुवात केली होती. दवाखाना, अंत्यविधी यासह अत्यावश्यक सेवेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ऑनलाइन अर्ज करून ई-पास मिळविला जात होता. मात्र, ई-पास घेताना काही नागरिक केवळ गंमत म्हणून ऑनलाइन अर्ज करून वेगवेगळी कारणे देत होते.

सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी ?

जिल्ह्यात मागील एक ते दीड महिन्यात तब्बल ४२ हजार १२७ जणांनी ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज केला आहेत. त्यापैकी २० हजार १२६ जणांनी दवाखान्यात, अंत्यविधीला जाण्याची कारणे सांगितली. काही जणांनी तर चार ते पाच वर्षांपूर्वीचे तपासणीची कागदपत्रे दाखवून आता मला तपासणीसाठी जायचे आहे, असे सांगून ई-पास मिळविण्यासाठी प्रयत्न केला. सर्वांनाच मेडिकल इमर्जन्सी कशी काय, असा प्रश्न पडला आहे.

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही

मार्च २०२० पासून घरात कोंडून असणाऱ्या नागरिकांना आता बाहेर पडण्याची उत्सुकता आहे. यासाठी बायकोला भेटायला जाण्याचा अनेकांनी बेत केला. शिवाय, सहलीवर जाण्याचा अनेकांनी बेत केला.

बहुतांश अर्जांत वैद्यकीय कारण देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ जवळच्या नातेवाइकांचे लग्न, अंत्यविधीचे कारण देण्यात आले आहे, तर २५ हजार ०२५ जणांचे नाकारण्यात आलेल्या अर्जात अफलातून कारणे देण्यात आली आहेत.

नातेवाइकांची सहज भेट, कारण नसताना प्रवास, याशिवाय लग्नानंतर फिरायला जाण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे, तर काहींनी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तताच केली नसल्याचे आढळून आले आहे.

ज्यांना खरच गरज होती, त्यांना दिले पास

ई-पाससाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपले अर्ज दाखल केले होते. या अर्जांची पाहणी व छाननी केल्यानंतर अनेक अर्जांत त्रुटी असल्याचे आढळून आले. दरम्यान, अनेकांनी अत्यावश्यक वगळता सुमार कारणे नोंद केली आहेत. काहींनी फिरायला जायचे आहे, अशीही नोंद केली आहे. परिणामी, अनेक अर्ज रद्द करावे लागले. अत्यावश्यक कारण असल्यास त्याला मंजूर करण्यात आले आहे.

विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना