शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बायकोला भेटायला जाण्यासाठी हवाय ई-पास ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

जालना : कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांच्या काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने ई-पास बंधनकारक केला ...

जालना : कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांच्या काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने ई-पास बंधनकारक केला आहे. मात्र, ई-पास घेताना काही नागरिक अफलातून कारणे देत आहेत. मला माझ्या बायकोला भेटायला जायचं आहे, यासाठी मला ई-पास हवाय, मला लग्नाला जायचं आहे आदी कारणे ई-पास घेताना दिली जात आहेत.

जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. अशीच स्थिती राज्यभरात होती. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते. एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत होते, तर दुसरीकडे अंत्यसंस्कार, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने ई-पास देण्यास सुरुवात केली होती. दवाखाना, अंत्यविधी यासह अत्यावश्यक सेवेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ऑनलाइन अर्ज करून ई-पास मिळविला जात होता. मात्र, ई-पास घेताना काही नागरिक केवळ गंमत म्हणून ऑनलाइन अर्ज करून वेगवेगळी कारणे देत होते.

सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी ?

जिल्ह्यात मागील एक ते दीड महिन्यात तब्बल ४२ हजार १२७ जणांनी ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज केला आहेत. त्यापैकी २० हजार १२६ जणांनी दवाखान्यात, अंत्यविधीला जाण्याची कारणे सांगितली. काही जणांनी तर चार ते पाच वर्षांपूर्वीचे तपासणीची कागदपत्रे दाखवून आता मला तपासणीसाठी जायचे आहे, असे सांगून ई-पास मिळविण्यासाठी प्रयत्न केला. सर्वांनाच मेडिकल इमर्जन्सी कशी काय, असा प्रश्न पडला आहे.

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही

मार्च २०२० पासून घरात कोंडून असणाऱ्या नागरिकांना आता बाहेर पडण्याची उत्सुकता आहे. यासाठी बायकोला भेटायला जाण्याचा अनेकांनी बेत केला. शिवाय, सहलीवर जाण्याचा अनेकांनी बेत केला.

बहुतांश अर्जांत वैद्यकीय कारण देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ जवळच्या नातेवाइकांचे लग्न, अंत्यविधीचे कारण देण्यात आले आहे, तर २५ हजार ०२५ जणांचे नाकारण्यात आलेल्या अर्जात अफलातून कारणे देण्यात आली आहेत.

नातेवाइकांची सहज भेट, कारण नसताना प्रवास, याशिवाय लग्नानंतर फिरायला जाण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे, तर काहींनी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तताच केली नसल्याचे आढळून आले आहे.

ज्यांना खरच गरज होती, त्यांना दिले पास

ई-पाससाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपले अर्ज दाखल केले होते. या अर्जांची पाहणी व छाननी केल्यानंतर अनेक अर्जांत त्रुटी असल्याचे आढळून आले. दरम्यान, अनेकांनी अत्यावश्यक वगळता सुमार कारणे नोंद केली आहेत. काहींनी फिरायला जायचे आहे, अशीही नोंद केली आहे. परिणामी, अनेक अर्ज रद्द करावे लागले. अत्यावश्यक कारण असल्यास त्याला मंजूर करण्यात आले आहे.

विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना