शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

५५ अतिक्रमणांवर हातोडा: परिसरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:48 IST

नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी शिवाजी पुतळा ते टपाल कार्यालय या परिसरातील पक्के बांधकाम, टपऱ्या, अशी ५५ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी शिवाजी पुतळा ते टपाल कार्यालय या परिसरातील पक्के बांधकाम, टपऱ्या, अशी ५५ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.शहरातील महत्त्वाच्या शिवाजी पुतळा ते जिजामाता प्रवेशद्वार या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले आहे. अनेकांनी पक्के बांधकाम करून रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. तर काहींनी पत्र्याचे थेड टाकून झेरॉक्स सेंटर, चहा टपरी, हॉटेल्स, डीटीपी सेंटर, सलून, गॅरेज असे व्यवसाय सुरू केले आहेत. या दुकानांसमोर फेरिवाल्यांनी अर्धा रस्ता व्यापून टाकला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होते. तसेच रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. अतिक्रमणामुळे अनेकदा वादही घडतात. याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. तसेच भारत संचार निगम लिमिटेड व टपाल कार्यालयासमोरील अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमण धारकांनी याकडे दुर्लक्ष केले. वारंवार लेखी व तोडी सूचना देऊनही अतिक्रमणे जैसे थे राहिल्याने नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी सहा वाजता अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. शिवाजी पुतळा चौकापासून पत्र्याचे शेड जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे एकच गोंधळ उडाला. अतिक्रमणधारक घाईगडबडीत दुकानांवर पोहचले. सुरुवातीला काहींनी विरोध केला. अधिका-यांनी थाटलेल्या दुकानांची अधिकृत कागदपत्रे देण्यास सांगितले. मात्र, कुठलेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने, पोलीस प्रशासनाच्या अधिका-यांनी अतिक्रमण धारकांना कारवाईत अडथळा न आणण्याच्या सूचना केल्या. पालिकेचे अधिकारी ऐकण्याचा मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अतिक्रमण धारकांनी हाती येईल ते सामान बाहेर काढून टाकण्यास सुरुवात केली. जेसीबीने अतिक्रमण पाडत असताना अनेक दुकानांमधील खुर्च्या, फर्निचर, सिलिंग, फॅन, टेबल तुटले. पत्र्याचे शेडही मोडले. सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत चालेल्या कारवाईत पालिकेच्या पथकाने २५ हून अधिक पक्की अतिक्रमणे पाडली. तसेच पत्र्याचे शेडही हटविले. दिवसभरात एकूण ५५ अतिक्रमणे पाडण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.पालिकेचे नव्वद सफाई कामगार , १२ ट्रक्टर, एक जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे पाडून साहित्य जमा करण्यात आले. शहरातील इतर भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी या पुढेही अशा प्रकारे अचानक कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाhawkersफेरीवाले