शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

५५ अतिक्रमणांवर हातोडा: परिसरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:48 IST

नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी शिवाजी पुतळा ते टपाल कार्यालय या परिसरातील पक्के बांधकाम, टपऱ्या, अशी ५५ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी शिवाजी पुतळा ते टपाल कार्यालय या परिसरातील पक्के बांधकाम, टपऱ्या, अशी ५५ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.शहरातील महत्त्वाच्या शिवाजी पुतळा ते जिजामाता प्रवेशद्वार या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले आहे. अनेकांनी पक्के बांधकाम करून रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. तर काहींनी पत्र्याचे थेड टाकून झेरॉक्स सेंटर, चहा टपरी, हॉटेल्स, डीटीपी सेंटर, सलून, गॅरेज असे व्यवसाय सुरू केले आहेत. या दुकानांसमोर फेरिवाल्यांनी अर्धा रस्ता व्यापून टाकला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होते. तसेच रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. अतिक्रमणामुळे अनेकदा वादही घडतात. याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. तसेच भारत संचार निगम लिमिटेड व टपाल कार्यालयासमोरील अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमण धारकांनी याकडे दुर्लक्ष केले. वारंवार लेखी व तोडी सूचना देऊनही अतिक्रमणे जैसे थे राहिल्याने नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी सहा वाजता अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. शिवाजी पुतळा चौकापासून पत्र्याचे शेड जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे एकच गोंधळ उडाला. अतिक्रमणधारक घाईगडबडीत दुकानांवर पोहचले. सुरुवातीला काहींनी विरोध केला. अधिका-यांनी थाटलेल्या दुकानांची अधिकृत कागदपत्रे देण्यास सांगितले. मात्र, कुठलेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने, पोलीस प्रशासनाच्या अधिका-यांनी अतिक्रमण धारकांना कारवाईत अडथळा न आणण्याच्या सूचना केल्या. पालिकेचे अधिकारी ऐकण्याचा मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अतिक्रमण धारकांनी हाती येईल ते सामान बाहेर काढून टाकण्यास सुरुवात केली. जेसीबीने अतिक्रमण पाडत असताना अनेक दुकानांमधील खुर्च्या, फर्निचर, सिलिंग, फॅन, टेबल तुटले. पत्र्याचे शेडही मोडले. सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत चालेल्या कारवाईत पालिकेच्या पथकाने २५ हून अधिक पक्की अतिक्रमणे पाडली. तसेच पत्र्याचे शेडही हटविले. दिवसभरात एकूण ५५ अतिक्रमणे पाडण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.पालिकेचे नव्वद सफाई कामगार , १२ ट्रक्टर, एक जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे पाडून साहित्य जमा करण्यात आले. शहरातील इतर भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी या पुढेही अशा प्रकारे अचानक कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाhawkersफेरीवाले