शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

बांधावर जाऊन कृषी विभागाचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

शेतकऱ्यांना दिलासा : बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका पारध : गतवर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करून पारध (ता. भोकरदन) परिसरातील ...

शेतकऱ्यांना दिलासा : बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका

पारध : गतवर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करून पारध (ता. भोकरदन) परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रबी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सध्या पिकेही चांगली आली आहेत; परंतु मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगराई पडली आहे. शेतकऱ्यांमधून होणारी मागणी पाहता आता कृषी विभागाच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई मंडळात बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

यात शेतकऱ्यांना अळीला नियंत्रणात आणण्यासाठीच्या राबवायच्या उपाय- योजना याविषयी माहिती देण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांनी खचून न जाता कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी केले. गतवर्षी पारध परिसरातील शेतकऱ्यांना खरिपात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही; परंतु पाऊस अधिकचा झाल्याने लघु- मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, नदी, नाले, विहीर बोअर यांची पाणी पातळी मोठी वाढली होती. या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी रबीतील गहू, हरभरासह इतर पिकांची पेरणी केली आहे. सध्या गव्हाला ओंब्या आल्या असून, हरभऱ्याला देखील काही ठिकाणी घाटे लागले आहेत. असे असताना मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. याचा परिणाम पिकांवर रोगराई पडण्यावर झाला आहे. रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या ओषधांची पिकांवर फवारणी करीत आहेत; परंतु रोगराई अटोक्यात येत नाही.

एक एकर गहू, हरभरा याची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांचा खर्च येत आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. या मागणीची दखल घेत तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. यात पिकांवरील रोगराई अटोक्यात आणण्यासाठी राबवायच्या उपाययोजना सांगितल्या जात आहेत.

चौकट

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात बुधवारी तालुका कृषी अधिकारी भुते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी जवस, ओवा, बडीशेप या आंतर पिकांकडेही लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. या पथकात कृषी सहायक मोहित पवार, रामेश्वर काळे आदींचा सहभाग होता.

फोटो ओळ : पिंपळगाव रेणुकाई मंडळात शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी मार्गदर्शन केले.