शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

द्राक्ष उत्पादक पर्यायी फळबागांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST

विष्णू वाकडे जालना : पाणलोटमधून पुढे येत द्राक्ष बागेचे हब म्हणून परिचित झालेल्या कडवंची येथील द्राक्ष बागायतदारांनी आता पर्यायी ...

विष्णू वाकडे

जालना : पाणलोटमधून पुढे येत द्राक्ष बागेचे हब म्हणून परिचित झालेल्या कडवंची येथील द्राक्ष बागायतदारांनी आता पर्यायी फळबागांकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी या भागात आता केळी, सीताफळासह पेरू, मोसंबीच्या बागा बहरू लागल्या आहेत.

तब्बल बाराशे एकरच्या वर एवढे मोठे क्षेत्र द्राक्ष बागेचे असताना गेल्या २०-२५ वर्षापासून द्राक्षामध्ये काम करणाऱ्या उत्पादकांनी आता द्राक्ष उत्पादनाकडे काही प्रमाणात पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच-सहा वर्षाचा अनुभव विचारात घेता कडवंची येथील द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष फळ पिकापासून नुकसान सहन करावे लागत आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका द्राक्ष बागांना बसल्याचे येथील द्राक्ष उत्पादक सांगतात. सन २०१९ - २०च्या हंगामामध्ये द्राक्ष बागांमध्ये व्यवस्थित फूट झाली नसल्याने उत्पन्नाला फटका बसला. २०२० - २१च्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवेळी पाऊस पडल्याने पूर्णतः घड जिरले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एकरी दोन ते तीन लाख रुपयाचा खर्च करून अनेकांचा खर्चही वसूल झाला नसल्याचे पांडुरंग क्षीरसागर यांनी सांगितले. तर प्रगतशील शेतकरी श्रीकांत क्षीरसागर यांनी सांगितले की, वडिलोपार्जित द्राक्ष शेतीमध्ये नवीन काही बदल करण्यासाठी आपण पाच एकर वर गतवर्षी केळीची लागवड केली. यासाठी टिशू कल्चरची रोपे आपण वापरली असून, प्रतिझाड दीडशे रुपयांपर्यंत खर्च आला. खर्च वजा जाता बारा लाखांचे उत्पन्न या केळीच्या बागेपासून मिळाले. श्रीकांत यांनी यावर्षी केळीचा खोडवा घेतला जेणेकरून खर्चात मोठी बचत झाली. अशा प्रकारचा प्रयोग दोन ते तीन वेळा जाणीवपूर्वक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो