शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादक पर्यायी फळबागांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST

विष्णू वाकडे जालना : पाणलोटमधून पुढे येत द्राक्ष बागेचे हब म्हणून परिचित झालेल्या कडवंची येथील द्राक्ष बागायतदारांनी आता पर्यायी ...

विष्णू वाकडे

जालना : पाणलोटमधून पुढे येत द्राक्ष बागेचे हब म्हणून परिचित झालेल्या कडवंची येथील द्राक्ष बागायतदारांनी आता पर्यायी फळबागांकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी या भागात आता केळी, सीताफळासह पेरू, मोसंबीच्या बागा बहरू लागल्या आहेत.

तब्बल बाराशे एकरच्या वर एवढे मोठे क्षेत्र द्राक्ष बागेचे असताना गेल्या २०-२५ वर्षापासून द्राक्षामध्ये काम करणाऱ्या उत्पादकांनी आता द्राक्ष उत्पादनाकडे काही प्रमाणात पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच-सहा वर्षाचा अनुभव विचारात घेता कडवंची येथील द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष फळ पिकापासून नुकसान सहन करावे लागत आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका द्राक्ष बागांना बसल्याचे येथील द्राक्ष उत्पादक सांगतात. सन २०१९ - २०च्या हंगामामध्ये द्राक्ष बागांमध्ये व्यवस्थित फूट झाली नसल्याने उत्पन्नाला फटका बसला. २०२० - २१च्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवेळी पाऊस पडल्याने पूर्णतः घड जिरले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एकरी दोन ते तीन लाख रुपयाचा खर्च करून अनेकांचा खर्चही वसूल झाला नसल्याचे पांडुरंग क्षीरसागर यांनी सांगितले. तर प्रगतशील शेतकरी श्रीकांत क्षीरसागर यांनी सांगितले की, वडिलोपार्जित द्राक्ष शेतीमध्ये नवीन काही बदल करण्यासाठी आपण पाच एकर वर गतवर्षी केळीची लागवड केली. यासाठी टिशू कल्चरची रोपे आपण वापरली असून, प्रतिझाड दीडशे रुपयांपर्यंत खर्च आला. खर्च वजा जाता बारा लाखांचे उत्पन्न या केळीच्या बागेपासून मिळाले. श्रीकांत यांनी यावर्षी केळीचा खोडवा घेतला जेणेकरून खर्चात मोठी बचत झाली. अशा प्रकारचा प्रयोग दोन ते तीन वेळा जाणीवपूर्वक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो