शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीला सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:46 IST

बोंडअळीच्या नुकसानीला सरकारच जबादार असल्याचा आरोप मंगळवारी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुलाबी बोंडअळीमुळे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतक-यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. बोंडअळीची सुरुवात मागील वर्षीची झाली होती. त्याच वेळी सरकारने जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र, बियाणे कंपन्यांना दोषी ठरवून प्रतिबंधात्मक उपायांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे बोंडअळीच्या नुकसानीला सरकारच जबादार असल्याचा आरोप मंगळवारी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला.शेतकरी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, यवतमाळचे विजय निवल व कोल्हापूरचे अजित नरदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. शेतकºयांना नवतंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम बनविण्याची गरज आहे. मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासनाने व्यापक प्रचार मोहीम सुरू करून त्याबाबत शेतक-यांना जागृत करणे आवश्यक होते. गुजरात सरकाने बोंडअळीचा परिणाम झाल्यानंतर ७० कोटी रुपयांचा निधी याबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यासाठी खर्च केला. मात्र, राज्य सरकाने ही बियाण्याची समस्या समजून सिड्स कंपन्यांना दोषी ठरवले. जनुकीय तज्ज्ञ अजित नरदे म्हणाले, जीएम तंत्रज्ञानातील बीजी एक व बीजी दोन या बिटी बियाण्यांना अनुक्रमे २००२ व २००६ मध्ये परवानगी मिळाली. अन्य देशात सात जीएम तंत्रज्ञानाचा वापर सुरू असताना, भारतात राजकीय विरोध, दूरदृष्टीचा अभाव यामुळे आजही जीएम दोननंतरचे नवीन तंत्रज्ञान शेतक-यांना मिळालेले नाही. विजय निवल म्हणाले, की भारताने सिडस कंपन्यांना नवीन जीएम तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी दिली नाही तर शेतकरीच नव्हे तर भारताची अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल. कारण भारतीय अर्थव्यवस्थेत कापूस आणि वस्त्रोद्योगाला सर्वाधिक महत्त्व आहे. मात्र, आता वापरत असलेले तंत्रज्ञान कमकुवत झाल्याने उत्पादनात घट होत आहे.या वेळी शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब कदम, महिला प्रांताध्यक्ष गीता खांडेभराड, जिल्हाध्यक्ष सुधीर शिंदे, बाबूराव गोल्डे आदींची उपस्थिती होती.