शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीला सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:46 IST

बोंडअळीच्या नुकसानीला सरकारच जबादार असल्याचा आरोप मंगळवारी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुलाबी बोंडअळीमुळे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतक-यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. बोंडअळीची सुरुवात मागील वर्षीची झाली होती. त्याच वेळी सरकारने जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र, बियाणे कंपन्यांना दोषी ठरवून प्रतिबंधात्मक उपायांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे बोंडअळीच्या नुकसानीला सरकारच जबादार असल्याचा आरोप मंगळवारी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला.शेतकरी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, यवतमाळचे विजय निवल व कोल्हापूरचे अजित नरदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. शेतकºयांना नवतंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम बनविण्याची गरज आहे. मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासनाने व्यापक प्रचार मोहीम सुरू करून त्याबाबत शेतक-यांना जागृत करणे आवश्यक होते. गुजरात सरकाने बोंडअळीचा परिणाम झाल्यानंतर ७० कोटी रुपयांचा निधी याबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यासाठी खर्च केला. मात्र, राज्य सरकाने ही बियाण्याची समस्या समजून सिड्स कंपन्यांना दोषी ठरवले. जनुकीय तज्ज्ञ अजित नरदे म्हणाले, जीएम तंत्रज्ञानातील बीजी एक व बीजी दोन या बिटी बियाण्यांना अनुक्रमे २००२ व २००६ मध्ये परवानगी मिळाली. अन्य देशात सात जीएम तंत्रज्ञानाचा वापर सुरू असताना, भारतात राजकीय विरोध, दूरदृष्टीचा अभाव यामुळे आजही जीएम दोननंतरचे नवीन तंत्रज्ञान शेतक-यांना मिळालेले नाही. विजय निवल म्हणाले, की भारताने सिडस कंपन्यांना नवीन जीएम तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी दिली नाही तर शेतकरीच नव्हे तर भारताची अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल. कारण भारतीय अर्थव्यवस्थेत कापूस आणि वस्त्रोद्योगाला सर्वाधिक महत्त्व आहे. मात्र, आता वापरत असलेले तंत्रज्ञान कमकुवत झाल्याने उत्पादनात घट होत आहे.या वेळी शेतकरी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब कदम, महिला प्रांताध्यक्ष गीता खांडेभराड, जिल्हाध्यक्ष सुधीर शिंदे, बाबूराव गोल्डे आदींची उपस्थिती होती.