शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला लागले यंदा ग्रहण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:08 IST

शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश क्षमतेएवढेही विद्यार्थी येतात की, नाही अशीच चिन्ह आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश क्षमतेएवढेही विद्यार्थी येतात की, नाही अशीच चिन्ह आहेत.तंत्रनिकेतनच्या तीन वर्षाच्या डिप्लोमा केलेल्यांना उद्योगांकडून मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन जालना जिल्ह्यात दोन शासकीय आणि दोन खासगी तंत्रनिकेतन महाविद्यलये आहेत. यंदा शासकीय महाविद्यालयातील प्रवेशाची स्थिती एवढी बिकट असल्याने खाजगी विद्यालयांचा विचार न केलेलाच बरा.जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, इलेट्रीकल, मॅकेनिकल, आयटी, काँप्युटर इंजिनिअर आणि तसेच केमिकल असे डिप्लोमा आहेत. त्यात दोन्ही महाविद्यालयात ४८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. प्रथमवर्ग प्रवेशासाठी यंदा १६ जुलै ही अंतिम तारीख होती, ती यंदा वाढवून २० जुलै करण्यात आली. ही अंतिम तारीख संपण्यासही एकच दिवस शिल्लक आहे. असे असताना जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २८० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, अंबड येथे हीच नोंदणी केवळ ११० एवढी कमी झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांचा ओढा नेमका कशामुळे घटला हा संशोधनाचा विषय असून, यामुळे उच्च व तंत्रशिक्षण पातळीवरही चिंतन सुरू असल्याचे बोलले जात आहे. यंदा राखीव विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडणे बंधनकारक केले होते. मात्र, नंतर ही अट शिथिल करण्यात आल्याने तरी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय