शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला लागले यंदा ग्रहण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:08 IST

शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश क्षमतेएवढेही विद्यार्थी येतात की, नाही अशीच चिन्ह आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश क्षमतेएवढेही विद्यार्थी येतात की, नाही अशीच चिन्ह आहेत.तंत्रनिकेतनच्या तीन वर्षाच्या डिप्लोमा केलेल्यांना उद्योगांकडून मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन जालना जिल्ह्यात दोन शासकीय आणि दोन खासगी तंत्रनिकेतन महाविद्यलये आहेत. यंदा शासकीय महाविद्यालयातील प्रवेशाची स्थिती एवढी बिकट असल्याने खाजगी विद्यालयांचा विचार न केलेलाच बरा.जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, इलेट्रीकल, मॅकेनिकल, आयटी, काँप्युटर इंजिनिअर आणि तसेच केमिकल असे डिप्लोमा आहेत. त्यात दोन्ही महाविद्यालयात ४८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. प्रथमवर्ग प्रवेशासाठी यंदा १६ जुलै ही अंतिम तारीख होती, ती यंदा वाढवून २० जुलै करण्यात आली. ही अंतिम तारीख संपण्यासही एकच दिवस शिल्लक आहे. असे असताना जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २८० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, अंबड येथे हीच नोंदणी केवळ ११० एवढी कमी झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांचा ओढा नेमका कशामुळे घटला हा संशोधनाचा विषय असून, यामुळे उच्च व तंत्रशिक्षण पातळीवरही चिंतन सुरू असल्याचे बोलले जात आहे. यंदा राखीव विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडणे बंधनकारक केले होते. मात्र, नंतर ही अट शिथिल करण्यात आल्याने तरी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय