शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव, हातची गेलेली नोकरी यासह इतर अनेक कारणांनी अनेकांच्या मनावरील ताण वाढत आहे. या ताणतणावात कुटुंबातील ...

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव, हातची गेलेली नोकरी यासह इतर अनेक कारणांनी अनेकांच्या मनावरील ताण वाढत आहे. या ताणतणावात कुटुंबातील सदस्य, मित्रांसमवेत असलेली संवादाची दरी वाढली तर आपल्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. अशाच संवादाच्या दरीतून मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद झाल्या. अनेक कंपन्यांनी मनुष्यबळामध्ये कपात केली. या कपातीच्या कात्रीत सापडलेल्या अनेक युवकांमध्ये नैराश्य आलेले आहे. अनेकांना काम मिळाले तर अनेकांच्या हाताला अद्याप काम नाही. अनेकजण शेतात कामाला जात आहेत. कोरोनामुळे बदललेल्या जीवन शैलीत अनेकांचा मानसिक तणाव वाढला आहे. या ताणतणावात कुटुंबातील सदस्य असोत किंवा मित्र असोत यांच्यामधील संवादाची दरी वाढू लागली आहे. संवाद कमी झाल्याने अनेकजण मानसिक आजाराने त्रस्त होत आहेत. शिवाय आत्महत्येसारखे विचारही अनेकांच्या मनात घर करण्याची भीती असते. त्यामुळे अशा घटना थांबविण्यासाठी एकमेकांमध्ये निर्माण झालेली संवादाची दरी दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मन हलके करणे हाच उपाय

मनातील नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.

सकस आहार घेण्यासह नियमित व्यायाम करावा.

रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घ्यावी

रागावर नियंत्रण ठेवावे

अडचणींवर मात करण्यासाठी इतरांशी चर्चा करावी

मानसोपचार तज्ज्ञ म्हणातात...

मागील काही दिवसांपासून मानसिक आजारांनी त्रस्त असल्याने उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मानसिक आजारातून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनीच पुढाकार घेऊन वेळोवेळी योग्य संवाद साधणे गरजेचे आहे. एकमेकांशी सुयोग्य संवाद साधला तर मानसिक आजार दूर होण्यास मदत होते.

डॉ. नितीन पवार

मानसिक आजार जडण्याची विविध कारणे आहेत. अनेकजण छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तणावात जातात. अशा व्यक्तींची मानसिकता ओळखून वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. पती-पत्नी, पालक-मुलांमधील संवादही यात महत्त्वाचा आहे. समोरील व्यक्तीची मानसिकता ओळखून त्यांचे मन परिवर्तन करून मानसिक आजारातून बाहेर काढता येते. शिवाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणेही महत्त्वाचे आहे.

डॉ. संदीप लहाने