शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

गंगाधर पानतावणे म्हणजे महाराष्ट्राचे नालंदा विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:03 IST

ज्ञान संपदेसाठी त्या काळात प्रसिध्द असलेले नालंदा विद्यापीठासारखीच ख्याती असलेले दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांची होती. त्यांनी आपले ज्ञानरुपी सागरातून त्यांनी अनेक लेखक, कवी, साहित्यीक, नाटककार, प्राध्यापक घडविले. आणि नवलेखकांना लिहिते केले असे बहुआयामी व्यक्तीमत्व डॉ. पानतावणे एक राज्याचे नालंदा विद्यापीठच होते, असे मत डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन : पहिल्या परिसंवादात मान्यवरांचा सूर, लेखक, समीक्षक, प्राध्यापक आदींची उपस्थिती

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ज्ञान संपदेसाठी त्या काळात प्रसिध्द असलेले नालंदा विद्यापीठासारखीच ख्याती असलेले दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांची होती. त्यांनी आपले ज्ञानरुपी सागरातून त्यांनी अनेक लेखक, कवी, साहित्यीक, नाटककार, प्राध्यापक घडविले. आणि नवलेखकांना लिहिते केले असे बहुआयामी व्यक्तीमत्व डॉ. पानतावणे एक राज्याचे नालंदा विद्यापीठच होते, असे मत डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केले.३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवारी येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनानंतर झालेल्या परिसंवादात ‘पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे बहुआयामी सांस्कृतीक व्यक्तिमत्व’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चिंतामन कांबळे उपस्थित होते. या परिसंवादात शत्रुघ्न जाधव, निलकांत चव्हाण, विश्वास वसेकर, सुरेश साबळे, नारायण राऊत, मिलिंद बागुल, संपत गायकवाड, सुशिला मुल - जाधव, डॉ. केशव देशमुख, डॉ. वासुदेव मुलाटे आदी वक्त्यांनी सहभाग घेतला होता.मराठी सह, इतिहास, नाटक, संस्कृती आणि माणसांना ओळखण्याची त्यांची पारख होती. मराठी भाषाकोष निर्मीतीसाठी त्यांनी केलेले योगदान फार मोठे आहे. या परिसंवादातून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू उलघडण्यास वेळ कमी पडले असे मत डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केले. डॉ. पानतावणे यांना चिंतनशील स्वरुपाचे लेखन करुन समाजाला दिशा देण्याचे काम केले. ते एक चालते बोलते विद्यापीठच होते असे देशमुख म्हणाले.डॉ. पानतावणे यांनी नवलेखकांना लिहिते केले. त्यांच्या अमुल्य मार्गदर्शनमुळेच मला लिहिण्याचे बळ मिळाल्याचे प्रा. शत्रुघ्न जाधव म्हणाले. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वसा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या पानतावणे सरांच्या बोलण्यात वागण्यात एकवाक्यता होती. नवलेखकांनी नाउमेद होऊ नये म्हणून त्यांनी अनेकांना लिखाणाची शैली कशीअसावी याविषयी याचे बारकावे सांगून अनेकांना घडविल्याचे डॉ. सुशिला मुल जाधव मत व्यक्त केले. अनेक चांगले, वाईट लेखन करणाºया लेखकांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम डॉ.पानतावणे यांनी केले. अनेक चळवळी आल्या गेल्या मात्र दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलन समाजाला दिशा देणारे साहित्य संमेलन ठरत आहे. डॉ. पानतावणे यांच्या स्वभावाचे विविध पैलू डॉ. मुलाटे यांनी सांगितले. एक लेखक कवी, नाटकार आदीसह ते एक कुटुंबवत्सल व्यक्तीमत्व होते असे मुलाटे म्हणाले. अस्मितादर्श चळवळ चालवितांना अनेक चढ उतार प्रसंगाना त्यांनी खंबीरपणे तोड दिले. मात्र कोणाचाही व्देष केला नाही. यातूनच त्याचे बहुआयामी व्यक्तमत्व समोर येते डॉ. मुलाटे म्हणाले.अध्यक्षीय समारोप करतांना डॉ. चिंतामन कांबळे यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांनी विद्यार्थी देशेपासून त्यांचा मला कसा सहवास लाभला याची आठवण करुन दिली. जात. धर्म, पंथ यांच्या पलिकडे जाऊन विचार करणारे डॉ. गंगाधर पानतावणे एक वेगळेच रसायण होते. त्यांच्यात मानवता होती. त्यांना जो कोणी भेटला त्याला त्यांनी बोलायला शिवविले, लिहायला शिवविले त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही उंची गाठल्याचे या परिसंवादाचे अध्यक्ष चिंतामन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. एकनाथ शिंदे तर अ‍ॅड. कैलास रत्नपारखे आभार मानले.डोळस व्यक्तीमत्वअनेक दलित, दलित्तेतर समाजातील नवलेखकांना डॉ गंगाधर पानतावणे यांनी नेहमीच लिखाणासाठी प्रोत्साहीत केले. राज्यासह देशभरात त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे डोळे घेऊन समाजासाठी डोळस काम करणारे एक बहुआयामी असे व्यक्तीमत्व डॉ. पानतावणे यांच्या आठवणी मान्यवरांनी यावेळी सांगितल्या.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन