शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Ganesh Visarjan : जालन्यात गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:38 IST

शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करतांना तिघांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला.

जालना : शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करतांना तिघांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला. ही घटना रविवारी पाचवाजेच्या सुमारास घडली. अमोल संतोष रणमुळे (१७, लक्ष्मीनारायणपुरा), निहाल खुशाल चौधरी, शेखर  मधुकर भदनेकर ( दोघे रा. लक्कडकोट) अशी मृतांची नावे आहेत. 

रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अमोल रणमुळे हा आपल्या मंडळासोबत गणपती विसर्जनासाठी मोती तलाव येथे आला. विसर्जनासाठी तो पाण्यात गेला असता, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. गणपती विसर्जन झाल्यानंतर मंडळातील सर्व सदस्य परतले. परंतु, त्यांना अमोल दिसला नाही. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी अमोलचा शोध घेत त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अमोलला मृत घोषित केले.

या घटनेनंतरच निहाल चौधरी, शेखर भदनेकर हे दोघे विसर्जनासाठी गेले होते. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते ही पाण्यात बुडाले. दोघांनाही नागरिकांनी पाण्याबाहेर काढुन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, सोमवारी तिघांच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर माजी आमदार कैलास गोरट्याल यांनी मयतच्या कुंटुबास प्रत्येक दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. परंतु, याला निहाल चौधरी व शेखर भदनेकर यांच्या नातेवाईकांनी विरोध करत नगरपालिकेसमोर मृतदेह आणून कुंटुबातील एक व्यक्तीस नगरपालिकेत नोकरी व मदत म्हणून प्रत्येक २५ लाख रुपये देण्याची मागणी केली. 

चौकशी करणारघटनेची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. - संतोष खांडेकर, मुख्याधिकारी 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनJalanaजालनाGanpati Festivalगणेशोत्सव