शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

तणाव मुक्तीसाठी खेळ महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:58 IST

जालना : तणावापासून मुक्तीसाठी खेळाला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून, खेळाडूंनी जय, पराजयाची तमा न बाळगता खिलाडू वृत्तीचे दर्शन ...

जालना : तणावापासून मुक्तीसाठी खेळाला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून, खेळाडूंनी जय, पराजयाची तमा न बाळगता खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर तीन दिवसीय विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पधेर्चे उद्घाटन गुरुवारी लोणीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. चे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आ. राजेश टोपे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, बीडचे एम.डी. सिंह, लातूरचे जी. श्रीकांत, औरंगाबादचे नवलकिशोर राम, परभणीचे पी. शिवशंकर, हिंगोलीचे अनिल भंडारी, नांदेडचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर आयुक्त विजयकुमार फड, उपायुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपायुक्त साज्ञा सावरकर, एसआरपीचे समादेशक भारत तांगडे, आरपीटीएसचे प्राचार्य पवार, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांची उपस्थिती होती. तीन दिवस चालणा-या या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत ४० क्रीडा प्रकारात खेळाडू क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत. लोणीकर म्हणाले की, कामातील शारीरिक आणि मानसिक थकवा घालविण्यासाठी, पुन्हा उत्साह- चैतन्य-आनंद निर्मितीसाठी क्रीडा व सांस्कृतिक प्रकारातील सहभाग आवश्यक ठरतो. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी महसूल विभागावर असून, विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे. भापकर म्हणाले की, तणावापासुन मुक्तीसाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा अत्यंत उपयुक्त आहेत. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेमध्ये आठही जिल्ह्यांतील २ हजारांपेक्षा अधिक खेळाडू ४० क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी जिल्ह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोबाईल अप विकसित केले असून या माध्यमातून या स्पर्धेचे नियोजन तसेच माहिती  उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटविण्यात आली. आठही जिल्ह्यातून आलेल्या संघाच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संचलनाच्या स्पर्धेत बीड जिल्ह्याने प्रथम, औरंगाबादने द्वितीय तर जालना जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला. यानंतर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले तर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी आभार मानले.