शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पथकाच्या अहवालानंतर मिळणार पुढील मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:59 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. मात्र या नंतरच्या मदतीचे दोन हप्ते हे केंद्रीय पथकाच्या अहवालानंतरच मिळणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/सिपोरा बाजार : जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. मात्र या नंतरच्या मदतीचे दोन हप्ते हे केंद्रीय पथकाच्या अहवालानंतरच मिळणार आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पथकाने बुधवारी भोकरदन तालुक्यात दौरा करून शेतक-यांची चर्चा केली.बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी राज्यशासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीला मदत मिळणार असल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.जिल्ह्यात मागील वर्षी पाच लाख २८ हजार ८७३ शेतक-यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. राज्यात तीन हजार ४८४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम शेतक-यांना दिली जाणार आहे. तीन समान हप्त्यांमध्ये मदत निधीचे वाटप केले जाणार आहे. जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ७३. ४३ लाखांचा मदत निधी प्राप्त झाला आहे.बुधवारी या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजारसह अन्य गावांना भेटी दिल्या.यावेळी त्यांनी शेतकºयांशी संवाद साधून अडचणी समजावून घेतल्या. या पथकातकेंद्रीय पथकाचे सचिव आश्विनीकुमार जौहरे, एस.पी. सिंह, कृषी आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांचा समावेश होता. पथका सोबत अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, तहसीलदार योगिता कोल्हे यांच्यासह सरपंच विजय कड, उपसरपंच शहेजाद मिर्झा, माजी जि.प. सदस्य शिवराम कड, ग्रा.पं. सदस्य अरूण चव्हाण, सोरमारे, मंडळ अधिकारी डिघे, तलाठी रामेश्वर कांबळे आदींची उपस्थिती होती.जालना : पथकाने केली शेतक-यांशी सविस्तर चर्चा...पथकाने सर्व प्रथम भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव व सिपोरा बाजार या गावांना भेट दिली. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील बोरगाव या गावाला भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. भोकरदन, जाफराबाद भागात कापसाची मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती तिन्ही गावातील शेतक-यांनी केंद्रीय पथकाला दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील शेतक-यांकडून त्यांनी किती एकरावर कापसाची लागवड केली होती, किती उत्पन्न झाले, कापूस पिकाला बोंड अळीचा प्रादुर्भाव कधी झाला, कोणत्या औषधाची फवारणी केली, विमा उतरवला होता काय आदी बाबींची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाcottonकापूस