शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

३५ वर्षांनंतर मित्र- मैत्रिणींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

आंबा- परतूर येथील जिल्हा परिषद शाळेतील १९८८ बॅचच्या दहावीचे विद्यार्थी ३५ वर्षांनंतर औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र ...

आंबा- परतूर येथील जिल्हा परिषद शाळेतील १९८८ बॅचच्या दहावीचे विद्यार्थी ३५ वर्षांनंतर औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र आले. एकमेकांना पाहून सर्वांनीच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर सर्वंजण आपआपल्या परीने वेगवेगळ्या शहरात स्थायिक होतात. त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन काही डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस, उद्योगपती होतात. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांची भेट होत नाही. कामे बाजूला ठेवून आपल्या दहावीच्या मित्रांना भेटण्यासाठी परतूर येथील १९८८ बॅचच्या दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये संपर्कात असलेल्या सर्व मित्रांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर एकमेकांचा शोध घेत सर्वांनी भेटण्याचे ठिकाण ठरवले. ७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वच मित्र-मैत्रिणी भेटल्या. प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला. काही जण भावुक झाले. तर काही जणांनी आपण लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. यावेळी प्रदीप ढाकरे, दिनेश होलाणी, बाबासाहेब साकळकर, मंजिरी कुलकर्णी बोरखेडीकर, डॉ. जया खंडागळे, डॉ. प्रणिता कदम, डॉ. सुनीता खिल्लारे, संध्या दिक्षित, मकरंद परतूरकर, कमलाकर गुजंवटीकर, चंद्रकांत ईघारे, अजय देसाई, बबलू खतिब, शांत ओझा, दीपक दिक्षित, लोकेश चौधरी, व्यंकटेश तनपुरे, उद्धव वायाळ, सतीश मारेठे, पापा भुतडा, संगीता उस्मानपूरकर, हर्षा खरात, ज्योती अग्रवाल, पुरवी ईघारे, अर्चना पोरवाल, गोदावरी दसमले, मंगल मुंदडा आदींची उपस्थिती होती.