आंबा- परतूर येथील जिल्हा परिषद शाळेतील १९८८ बॅचच्या दहावीचे विद्यार्थी ३५ वर्षांनंतर औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एकत्र आले. एकमेकांना पाहून सर्वांनीच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर सर्वंजण आपआपल्या परीने वेगवेगळ्या शहरात स्थायिक होतात. त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन काही डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पोलीस, उद्योगपती होतात. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांची भेट होत नाही. कामे बाजूला ठेवून आपल्या दहावीच्या मित्रांना भेटण्यासाठी परतूर येथील १९८८ बॅचच्या दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये संपर्कात असलेल्या सर्व मित्रांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर एकमेकांचा शोध घेत सर्वांनी भेटण्याचे ठिकाण ठरवले. ७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वच मित्र-मैत्रिणी भेटल्या. प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला. काही जण भावुक झाले. तर काही जणांनी आपण लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. यावेळी प्रदीप ढाकरे, दिनेश होलाणी, बाबासाहेब साकळकर, मंजिरी कुलकर्णी बोरखेडीकर, डॉ. जया खंडागळे, डॉ. प्रणिता कदम, डॉ. सुनीता खिल्लारे, संध्या दिक्षित, मकरंद परतूरकर, कमलाकर गुजंवटीकर, चंद्रकांत ईघारे, अजय देसाई, बबलू खतिब, शांत ओझा, दीपक दिक्षित, लोकेश चौधरी, व्यंकटेश तनपुरे, उद्धव वायाळ, सतीश मारेठे, पापा भुतडा, संगीता उस्मानपूरकर, हर्षा खरात, ज्योती अग्रवाल, पुरवी ईघारे, अर्चना पोरवाल, गोदावरी दसमले, मंगल मुंदडा आदींची उपस्थिती होती.