शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चार हजार शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:08 IST

बदनापूर तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाहीतालुक्यात खरीप हंगाम २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधितग्रस्त शेतक-यांना राज्य शासनाने आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला परंतु झारीतील शुक्राचार्यांमुळे हे अनुदान अनेक शेतक-यां पर्यंत अद्याप पोहोचलेले नाही़ तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीपोटी एकुण ६ कोटी ५४ लाख ३३ हजार २९६ रूपये अनुदान तालुका प्रशासनाला प्राप्त झाले होते यापैकी तालुक्यातील ३५ गावामधील १७०९५ शेतक-यांच्या एकूण ९४८७ हेक्टर बाधीत क्षेत्राला एकूण ६ कोटी ४९ लाख ५९ हजार ३६५ रूपये बाधित शेतक-यांच्या विविध बँकांमधील शाखांमधे जमा करण्यात आले यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांमधील शेतक-यांचे बँक खाते क्रमांक घेण्याबाबत संबंधित तलाठी व कृषि सहायकांना सूचना करण्यात आल्या होत्या परंतु उंटावरून शेळ्या राखण्याची सवय असणा-या काही कर्मचा-यांकडून अनेक गावांमधील अनेक शेतक-यांचे बँक खाते क्रमांक घेतले गेले नाहीत. परिणामी तहसील कार्यालयात जमा केलेल्या गावनिहाय शेतक-यांच्या याद्यांमध्ये अनेक शेतक-यांचे बँक खाते क्रमांक देण्यात आलेले नाही़ त्यामुळे बोंडअळीमुळे बाधित असलेल्या शेतक-यांना अनुदान असतानाही आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले़तालुक्यात हिवरा येथे १७१ शेतकरी, हिवरा दाभाडी ३६ शेतकरी, हालदोला १४१ शेतकरी, सोमठाणा ३८० शेतकरी, सिंधी पिंपळगाव ६ शेतकरी, सायगाव २५३ शेतकरी सागरवाडी ४६,शेलगाव १४४, सिरसगाव १०३, विल्हाडी ११३, वाघ्रूळ दाभाडी १८९ वाघ्रुळ डोंगरगाव २७७, वाकुळणी ९१,वंजारवाडी ९४, रोषणगाव २९५, राळा १०, राजेवाडी २६०, राजणगाव ३४, मेव्हणा २३, माळेगाव १७१,मालेवाडी २२, मानदेवळगाव ११३, मात्रेवाडी ३, मांडवा १७०, मांजरगाव २९४, भाकरवाडी ७, बुटेगाव ५१, पानखेडा ४४, नानेगाव १८८, वाल्हा ३४, रामखेडा १६, म्हसला ९०, भातखेडा ५५ पाडळी १४ इ. गावांमधील एकूण ३९४६ शेतक-यांचे अनुदान बँकेत गेलेले नाही त्यामुळे या शेतक-यांना आता शासनाकडून अनुदान आल्यानंतर बोंडअळीचे अनुदान मिळणार आहे़ पहिल्या टप्प्यात पाठविलेल्या बोंडअळीच्या अनुदानात तालुक्यातील केवळ वरूडी या गावातील पूर्ण शेतक-यांचे बँक खाते क्रमांक दिलेले आहेत तसेच यावेळी प्रथमच प्रशासनाकडून प्रत्येक बँकांच्या शाखानिहाय सुमारे साडेतीनशे ते चारशे धनादेश बनवून संबंधित शाखांमध्ये जमा केले त्यामुळे विविध शाखांमध्ये तातडीने निधी जमा झाला. शासनाकडून उर्वरित गावांना बोंडअळी अनुदानाची रक्कम मिळेनातालुक्यातील अद्यापही ५७ गावांमधील शेतक-यांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसgovernment schemeसरकारी योजना