शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

जिल्ह्यातील चार रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; आठ दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम एकूणच जनजीवनावर झाला आहे. रक्तदान करणारे युवक-युवती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम एकूणच जनजीवनावर झाला आहे. रक्तदान करणारे युवक-युवती कोरोनाच्या भीतीमुळे पुढे येत नसल्याने हा रक्तसाठा घटला आहे. जिल्ह्यातील चारही रक्तपेढ्यांमध्ये आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे.

कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान शिबिरावर मर्यादा आल्या आहेत. लस घेतल्यानंतर पुढील अठ्ठावीस दिवस रक्तदान न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचा मोठा फटका रक्तपेढ्यांना बसला असल्याची माहिती देण्यात आली.

हा रक्ताचा साठा वाढावा म्हणून सर्वच रक्तपेढ्यांनी युवक-युवती तसेच सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांनीदेखील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शासकीय रक्तपेढीत आठ दिवसांचाच साठा

जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आजघडीला केवळ पन्नास रक्ताच्या पिशव्या आहेत. यामध्ये अत्यंत आणीबाणीच्या वेळी हे रक्त रुग्णांना देण्यात येणार आहे. एकूणच रक्तदान शिबिरांसाठी नियमित रक्तदान करणाऱ्या संस्थांशी आम्ही संपर्क साधून आहोत. त्यामुळे लवकरच हा रक्ताचा तुटवडा भरून निघेल, असा विश्वास आहे. रक्तदात्यांनीही स्वत:हून पुढे येण्याची गरज आहे.

- पद्मजा सराफ, अतिरिक्त शल्यचिकित्सक, जालना

जनकल्याण रक्तपेढी

जालना येथील जनकल्याण रक्तपेढीतही अत्यल्प रक्तसाठा आहे. परंतु, हा रक्तसाठा वाढविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. अनेकजण यासाठी पुढाकार घेत असून, लवकरच ही समस्या सुटेल.

- पुसाराम मुंदडा, संचालक

स्वामी समर्थ रक्तपेढी

गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंसाठी आमची रक्तपेढी तत्पर असते. परंतु, सध्या रक्तदात्यांकडून शिबिर होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

- प्रकाश भांगे, सचिव

थॅलेसेमियाला प्राधान्य

जालना जिल्ह्यात जवळपास १५० पेक्षा अधिक थॅलेसेमिया या आजाराचे रुग्ण आहेत. त्यांना दर महिन्याला रक्त पुरवावे लागते. त्यामुळे या रुग्णांसाठी आम्ही नियमित रक्तदान करतो. - मिलिंद लांबे

लसीकरणाआधी करा रक्तदान

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम गतीने राबविली जात आहे. त्यामुळे रक्तदानावर याचा परिणाम झाला आहे. पंरतु, नागरिकांनी लसीकरणाचे कारण देण्याऐवजी लसीकरणाला जाण्याच्या तीन ते चार दिवस आधी रक्तदान केल्यास कुठलीच अडचण येत नाही. आजघडीला मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून केवळ जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करणे हाच आहे. त्यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. याला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.

- गणेश चौधरी