शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; आठ दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम एकूणच जनजीवनावर झाला आहे. रक्तदान करणारे युवक-युवती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम एकूणच जनजीवनावर झाला आहे. रक्तदान करणारे युवक-युवती कोरोनाच्या भीतीमुळे पुढे येत नसल्याने हा रक्तसाठा घटला आहे. जिल्ह्यातील चारही रक्तपेढ्यांमध्ये आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे.

कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदान शिबिरावर मर्यादा आल्या आहेत. लस घेतल्यानंतर पुढील अठ्ठावीस दिवस रक्तदान न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचा मोठा फटका रक्तपेढ्यांना बसला असल्याची माहिती देण्यात आली.

हा रक्ताचा साठा वाढावा म्हणून सर्वच रक्तपेढ्यांनी युवक-युवती तसेच सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांनीदेखील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शासकीय रक्तपेढीत आठ दिवसांचाच साठा

जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आजघडीला केवळ पन्नास रक्ताच्या पिशव्या आहेत. यामध्ये अत्यंत आणीबाणीच्या वेळी हे रक्त रुग्णांना देण्यात येणार आहे. एकूणच रक्तदान शिबिरांसाठी नियमित रक्तदान करणाऱ्या संस्थांशी आम्ही संपर्क साधून आहोत. त्यामुळे लवकरच हा रक्ताचा तुटवडा भरून निघेल, असा विश्वास आहे. रक्तदात्यांनीही स्वत:हून पुढे येण्याची गरज आहे.

- पद्मजा सराफ, अतिरिक्त शल्यचिकित्सक, जालना

जनकल्याण रक्तपेढी

जालना येथील जनकल्याण रक्तपेढीतही अत्यल्प रक्तसाठा आहे. परंतु, हा रक्तसाठा वाढविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. अनेकजण यासाठी पुढाकार घेत असून, लवकरच ही समस्या सुटेल.

- पुसाराम मुंदडा, संचालक

स्वामी समर्थ रक्तपेढी

गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंसाठी आमची रक्तपेढी तत्पर असते. परंतु, सध्या रक्तदात्यांकडून शिबिर होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

- प्रकाश भांगे, सचिव

थॅलेसेमियाला प्राधान्य

जालना जिल्ह्यात जवळपास १५० पेक्षा अधिक थॅलेसेमिया या आजाराचे रुग्ण आहेत. त्यांना दर महिन्याला रक्त पुरवावे लागते. त्यामुळे या रुग्णांसाठी आम्ही नियमित रक्तदान करतो. - मिलिंद लांबे

लसीकरणाआधी करा रक्तदान

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम गतीने राबविली जात आहे. त्यामुळे रक्तदानावर याचा परिणाम झाला आहे. पंरतु, नागरिकांनी लसीकरणाचे कारण देण्याऐवजी लसीकरणाला जाण्याच्या तीन ते चार दिवस आधी रक्तदान केल्यास कुठलीच अडचण येत नाही. आजघडीला मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून केवळ जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करणे हाच आहे. त्यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. याला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.

- गणेश चौधरी