शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आगामी लोकसभा निवडणुकीत जालन्यात खोतकर विरुद्ध दानवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:39 IST

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेने एकला चलो रे चा नारा देत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव संमत केला. या ठरावाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका म्हणजे शिवसेनेला गतवैभव पुन्हा मिळविण्याची संधी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.एक लोकसभा आणि पाच विधानसभा मतदार संघ असलेला जालना जिल्हा एके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तेव्हा जालन्यातून अर्जुन खोतकर, अंबडमधून शिवाजी चोथे आणि बदनापूरमधून नारायण चव्हाण हे शिवसेनेचे तीन-तीन उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे जालना जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता. पण काळानुसार राजकीय समीकरणे बदलत गेली आणि आज शिवसेनेचा एकच आमदार आहे. आक्रमक शैली आणि हिंदू अस्मिता याभोवती शिवसेनेचे राजकारण गेली ३५ वर्षे फिरत राहिले आहे. त्यातच आता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाचही विधानसभा मतदार संघात पक्षाला आता शिवसैनिकांची फौज तयार करण्यासह पक्ष बांधणीसाठी पुरेसा वेळही मिळणार आहे. जिल्ह्यात निवडणुका झाल्यास भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत अटळ आहे. त्यातच भाजपचे सत्ताकारणातून अर्थकारण आणि अर्थकारणातून सत्ताकारण असे धोरण अवलंबल्याने इतर पक्षांचे उमेदवार तसे तग धरणे कठीण असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांची फळी आणि योग्य नियोजन या आधारेच शिवसेनेला जिल्ह्यात निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. एकूणच या निवडणुका म्हणजे शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.युती आणि आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी आपापले बालेकिल्ले मजबूत केले होते. मात्र गेल्या काही दिवसांत लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील शाब्दिक चकमक वाढत गेली. आरोप-प्रत्यारोप व आव्हान-प्रतिआव्हानाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. राजकीय मोर्चेबांधणी आणि निवडणुकीची तयारी भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच सुरु केली आहे. जनसंपर्कासह जनाधार वाढविण्यावर या नेत्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. जालना, बदनापूर, घनसावंगी, परतूर आणि भोकरदन या पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक पूर्वीसारखी सोपी राहिलेली नाही. त्यातच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गणिते कशी जुळतात, यावरही सर्व उमेदवारांचे यशापयश अवलंबून राहणार आहे. शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते म्हणून उदयास आलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आ. शिवाजी चोथे, सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण, उपनेते लक्ष्मण वडले, माजी आ. संतोष सांबरे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बाबासाहेब इंगळे, रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले यांच्यासह सर्व तालुके आणि जिल्ह्यातील पदाधिकाºयांना निवडणुकांसाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सेनेतील पदाधिका-यांनी गटातटाचे राजकारण सोडून एकत्र येत एकदिलाने काम करण्याची गरज आहे. तरच शिवसेनेला पूर्ववैभव प्राप्त होऊ शकणार आहे.शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने लोकसभा मतदारसंघातही हा पक्ष आपला उमदेवार रिंगणात उतरवणार आहे. तर पक्षादेश जो असेल तो आपल्याला मान्यच असेल, अशी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भूमिका आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे खा. रावसाहेब दानवे, शिवसेनेतर्फे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आघाडीचाही उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार, हे निश्चित आहे.