शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आगामी लोकसभा निवडणुकीत जालन्यात खोतकर विरुद्ध दानवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:39 IST

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेने एकला चलो रे चा नारा देत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव संमत केला. या ठरावाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका म्हणजे शिवसेनेला गतवैभव पुन्हा मिळविण्याची संधी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.एक लोकसभा आणि पाच विधानसभा मतदार संघ असलेला जालना जिल्हा एके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तेव्हा जालन्यातून अर्जुन खोतकर, अंबडमधून शिवाजी चोथे आणि बदनापूरमधून नारायण चव्हाण हे शिवसेनेचे तीन-तीन उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे जालना जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता. पण काळानुसार राजकीय समीकरणे बदलत गेली आणि आज शिवसेनेचा एकच आमदार आहे. आक्रमक शैली आणि हिंदू अस्मिता याभोवती शिवसेनेचे राजकारण गेली ३५ वर्षे फिरत राहिले आहे. त्यातच आता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाचही विधानसभा मतदार संघात पक्षाला आता शिवसैनिकांची फौज तयार करण्यासह पक्ष बांधणीसाठी पुरेसा वेळही मिळणार आहे. जिल्ह्यात निवडणुका झाल्यास भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत अटळ आहे. त्यातच भाजपचे सत्ताकारणातून अर्थकारण आणि अर्थकारणातून सत्ताकारण असे धोरण अवलंबल्याने इतर पक्षांचे उमेदवार तसे तग धरणे कठीण असल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांची फळी आणि योग्य नियोजन या आधारेच शिवसेनेला जिल्ह्यात निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. एकूणच या निवडणुका म्हणजे शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.युती आणि आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी आपापले बालेकिल्ले मजबूत केले होते. मात्र गेल्या काही दिवसांत लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमधील शाब्दिक चकमक वाढत गेली. आरोप-प्रत्यारोप व आव्हान-प्रतिआव्हानाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. राजकीय मोर्चेबांधणी आणि निवडणुकीची तयारी भाजपसह अन्य पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच सुरु केली आहे. जनसंपर्कासह जनाधार वाढविण्यावर या नेत्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. जालना, बदनापूर, घनसावंगी, परतूर आणि भोकरदन या पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक पूर्वीसारखी सोपी राहिलेली नाही. त्यातच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गणिते कशी जुळतात, यावरही सर्व उमेदवारांचे यशापयश अवलंबून राहणार आहे. शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते म्हणून उदयास आलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आ. शिवाजी चोथे, सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण, उपनेते लक्ष्मण वडले, माजी आ. संतोष सांबरे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बाबासाहेब इंगळे, रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले यांच्यासह सर्व तालुके आणि जिल्ह्यातील पदाधिकाºयांना निवडणुकांसाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. सेनेतील पदाधिका-यांनी गटातटाचे राजकारण सोडून एकत्र येत एकदिलाने काम करण्याची गरज आहे. तरच शिवसेनेला पूर्ववैभव प्राप्त होऊ शकणार आहे.शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने लोकसभा मतदारसंघातही हा पक्ष आपला उमदेवार रिंगणात उतरवणार आहे. तर पक्षादेश जो असेल तो आपल्याला मान्यच असेल, अशी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भूमिका आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे खा. रावसाहेब दानवे, शिवसेनेतर्फे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आघाडीचाही उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार, हे निश्चित आहे.