शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

दोन घटनांमध्ये पाच मुलींचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 21:24 IST

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जालना जिल्ह्यात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यात दोन-दोन अशा चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पहिली घटना तालुक्यातील कस्तुरवाडी येथे तर दुसरी घटना परतूर तालुक्यातील वाई येथे घडली.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यातील घटना

 बदनापूर (जि. जालना) : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. यात दोन-दोन अशा चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. पहिली घटना तालुक्यातील कस्तुरवाडी येथे तर दुसरी घटना परतूर तालुक्यातील वाई येथे घडली.  

कस्तुरवाडी येथे गावाजवळील लाहुकी नदीत काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूवत असताना सायमा जुम्मेखॉ पठाण (१४)  गजाला शेख मोईन (१९) व  राणी उर्फ सुरया शेख मोईन (१३) तिघी पाण्यात पडल्या. त्यांनी एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. गजाला व सुरया या सख्ख्या बहिणी, तर सायमा त्यांची मामेबहीण होती. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सिमा शे शब्बीर (१३) हिचाही पाण्यात तोल गेला, मात्र बाहेर पडल्यामुळे ती सुदैवाने वाचली.  

रुग्णवाहिका वेळेवर मिळाली असती तर...सायमा पठाण या मुलीस पाण्याबाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता, जर आम्हाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती ती वाचली असती. अनेक वेळा दवाखान्यात फोन लावला परंतु आम्हाला गाडी येत आहे, असे सांगण्यात आले. शेवटी तिघींचे मृतदेह बैलगाडीत घेऊन मुख्य रस्त्यावर आलो, अशी माहिती गावातील रऊफ बेग यांनी दिली.

वाईत दोन बहिणींचा बुडून मृत्यूवडिलांनी झाडावरून हाकललेली वानरे स्वत:च्या दिशेने आल्याने घाबरून साक्षी गायकवाड (९) व मिनाक्षी गायकवाड (६) या दोन  बहिणी विहीरीत पडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.  मंठा तालुक्यातील वाई येथे रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.