शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

२० जिल्हाधिकाऱ्यांपैकी पाच जणांनी केला कार्यकाळ पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:58 IST

जालना जिल्ह्याची निर्मिती होऊन, आता ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जवळपास वीस जिल्हाधिका-यांनी येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परंतू केवळ पाच जणांनीच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना जिल्ह्याची निर्मिती होऊन, आता ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जवळपास वीस जिल्हाधिका-यांनी येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परंतू केवळ पाच जणांनीच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून आले.जालना जिल्हा झाल्यावर पहिले जिल्हाधिकारी म्हणून रामचंद्र चिन्मुळगुंज हे लभाले होते. त्यांनी एक मे १९८१ ते ३० नोव्हेंबर १९८१, अशी सेवा केली. त्यांच्या नंतर अरूणा बागची यांनी एक वर्ष ७ महिने, नानासाहेब पाटील दोन वर्ष ११ महिने, रविंद्र सुर्वे, २ वर्ष ११ महिने, आनंद कुलकर्णी २ वर्ष पाच महिने, घनशाम तलरेजा चार महिने, भालचंद वीर यांनी मात्र त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला.त्यांच्या नंतर आलेल्या कविता गुप्ता या तेरा महिने राहिल्या. प्रकाश जोशी दोन वर्ष तीन महिने राहिले. जोशी यांच्या नंतर जिल्हाधिकारी म्हणून आलेले श्रीधर पळसुळे यांनी तीन वर्ष एक महिने राहून कार्यकाळ पूर्ण करतानाच जालना महोत्सव घेऊन सांस्कृती क्षेत्रात मोठे उल्लेखनीय काम केले होते. पळसुळे यांच्या नंतर कॅप्टन ए.व्ही. देशपांडे हे जिल्हाधिकारी म्हणून आले होते, त्यांनी एक वर्ष तीन महिने पूर्ण केले.त्यानंतर २००२ ते २००५ या काळात मेरी निलिमा केरेकेट्टा तसेच रणजितसिंह देओल यांनी तीनवर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. देओल यांच्या जागेवर आलेले आर.डी.शिंदे एकच वर्ष राहिले. शिंदेच्या जागेवर आलेले विलास ठाकूर हे तीन वर्ष राहिले. ठाकूर यांच्या जागेवर आलेले तुकाराम मुंडे हे १४ महिनेच राहिले परंतु या अल्पश: कालावधीत ते नेहमीच तांत्रिक वादाच्या भोवºयात राहिले होते. मंडे यांच्यानंतर श्याम देशपांडे हे रूजू झाले होते. ते एक वर्ष ५ महिने राहिले. एस.आर. नायक हे दोन वर्ष राहिले. त्यांच्या जागेवर आलेले शिवाजी जोंधळे हे दोन वर्षे राहिले. मध्यंतरी निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम आणि विजयकुमार फड यांनीही अल्प काळासाठी ही जबाबदारी सांभाळली होती.विशेष म्हणजे जालना हे जिल्ह्याचे मुख्यालय असले तरी हव्या तशा नागरी सुविधा, मनोरंजन, शिक्षणाची साधने नसल्याने येथे अधिकारी तसेच त्यांचे कुंटुंबिय येण्यास फारसे उत्सुक नसतात. तसेच आज घडीला तर जालना हे सत्तेचे केंद्र असल्याने येथे आल्यानंतर ऐकावे तरी कोणाचे; हा प्रश्नही अधिकाºयांसमोर निर्माण होत असल्याचे खाजगीत बोलले जाते. त्यामुळे शिवाजी जोंधळे यांची बदली होऊन आता जवळपास महिना होत आहे. तरी देखील नूतन जिल्हाधिकारी म्हणून कोण येणार याचा संभ्रम कायम आहे. सध्या जिल्हाधिकाºयांचा पदभार असलेल्या खपले यांना विविध बैठका निमित्त बाहेरगावी जावे लागत असल्याने जबाबदार अधिकारी नसतो.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाcollectorतहसीलदार