शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

२० जिल्हाधिकाऱ्यांपैकी पाच जणांनी केला कार्यकाळ पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:58 IST

जालना जिल्ह्याची निर्मिती होऊन, आता ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जवळपास वीस जिल्हाधिका-यांनी येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परंतू केवळ पाच जणांनीच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना जिल्ह्याची निर्मिती होऊन, आता ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जवळपास वीस जिल्हाधिका-यांनी येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परंतू केवळ पाच जणांनीच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून आले.जालना जिल्हा झाल्यावर पहिले जिल्हाधिकारी म्हणून रामचंद्र चिन्मुळगुंज हे लभाले होते. त्यांनी एक मे १९८१ ते ३० नोव्हेंबर १९८१, अशी सेवा केली. त्यांच्या नंतर अरूणा बागची यांनी एक वर्ष ७ महिने, नानासाहेब पाटील दोन वर्ष ११ महिने, रविंद्र सुर्वे, २ वर्ष ११ महिने, आनंद कुलकर्णी २ वर्ष पाच महिने, घनशाम तलरेजा चार महिने, भालचंद वीर यांनी मात्र त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला.त्यांच्या नंतर आलेल्या कविता गुप्ता या तेरा महिने राहिल्या. प्रकाश जोशी दोन वर्ष तीन महिने राहिले. जोशी यांच्या नंतर जिल्हाधिकारी म्हणून आलेले श्रीधर पळसुळे यांनी तीन वर्ष एक महिने राहून कार्यकाळ पूर्ण करतानाच जालना महोत्सव घेऊन सांस्कृती क्षेत्रात मोठे उल्लेखनीय काम केले होते. पळसुळे यांच्या नंतर कॅप्टन ए.व्ही. देशपांडे हे जिल्हाधिकारी म्हणून आले होते, त्यांनी एक वर्ष तीन महिने पूर्ण केले.त्यानंतर २००२ ते २००५ या काळात मेरी निलिमा केरेकेट्टा तसेच रणजितसिंह देओल यांनी तीनवर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. देओल यांच्या जागेवर आलेले आर.डी.शिंदे एकच वर्ष राहिले. शिंदेच्या जागेवर आलेले विलास ठाकूर हे तीन वर्ष राहिले. ठाकूर यांच्या जागेवर आलेले तुकाराम मुंडे हे १४ महिनेच राहिले परंतु या अल्पश: कालावधीत ते नेहमीच तांत्रिक वादाच्या भोवºयात राहिले होते. मंडे यांच्यानंतर श्याम देशपांडे हे रूजू झाले होते. ते एक वर्ष ५ महिने राहिले. एस.आर. नायक हे दोन वर्ष राहिले. त्यांच्या जागेवर आलेले शिवाजी जोंधळे हे दोन वर्षे राहिले. मध्यंतरी निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम आणि विजयकुमार फड यांनीही अल्प काळासाठी ही जबाबदारी सांभाळली होती.विशेष म्हणजे जालना हे जिल्ह्याचे मुख्यालय असले तरी हव्या तशा नागरी सुविधा, मनोरंजन, शिक्षणाची साधने नसल्याने येथे अधिकारी तसेच त्यांचे कुंटुंबिय येण्यास फारसे उत्सुक नसतात. तसेच आज घडीला तर जालना हे सत्तेचे केंद्र असल्याने येथे आल्यानंतर ऐकावे तरी कोणाचे; हा प्रश्नही अधिकाºयांसमोर निर्माण होत असल्याचे खाजगीत बोलले जाते. त्यामुळे शिवाजी जोंधळे यांची बदली होऊन आता जवळपास महिना होत आहे. तरी देखील नूतन जिल्हाधिकारी म्हणून कोण येणार याचा संभ्रम कायम आहे. सध्या जिल्हाधिकाºयांचा पदभार असलेल्या खपले यांना विविध बैठका निमित्त बाहेरगावी जावे लागत असल्याने जबाबदार अधिकारी नसतो.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाcollectorतहसीलदार