केदारखेडा : येथील ग्रामपंचायत स्थापनेला ६१ वर्षे उलटले आहेत. परंतु, प्रथमच येथील सत्ता तरुणांच्या हाती देण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या संरपचांमध्ये सगळ्यात तरुण सरपंच व उपसरपंच गावाला मिळाले आहेत.
सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यावेळी सरपंचपदी सतीश शेळके तर उपसरपंचपदी पंडित जाधव यांची निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी सतीश शेळके व उपसरपंच पदासाठी पंडित जाधव यांचे एकमेव अर्ज आल्याने दोन्ही पदांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ११ जागांसाठी लढविलेल्या निवडणुकीत पॅनलप्रमुख संदीप शेळके यांच्या भाजपा पुरस्कृत श्री केदारेश्वर ग्रामविकास पॅनलने ११ जागांवर दणदणीत विजय मिळवून एकहाती सत्ता मिळविली. विरोधी रमेश मुरकुटे यांच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. यावेळी नवनिर्वाचित सदस्य ज्योती विलास मोरे, वर्षा कृष्णा जाधव, वत्सला रतन जाधव, बाबासाहेब राऊत, ज्ञानेश्वर जाधव, सरसाबाई नामदेव कांबळे, कासाबाई उत्तम तांबडे, शारदा विलास काळे, गीता संतोष मैद आदी सदस्यांनी मतदान केले. यावेळी नवनिवार्चित पदाधिकाऱ्यां सत्कार केला. फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. निर्वाचन अधिकारी म्हणून वल्लभ भोसले, तलाठी ज्ञानेश्वर गाडेकर, ग्रामसेविका के. एल. रोकडे यांनी काम पाहिले.
फोटो
गावात विकासाची कमतरता असून, निवडणूक काळात मतदारांसमोर गावविकासाची संकल्पना घेऊन गेलो होतो. जनतेने आमच्यावर विश्वास टाकून भरघोस मतांनी विजयी केले. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करून विकासासाठी कटिबध्द असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
-----------------------------