शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अखेर सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

बदनापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ...

बदनापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडले आहे. यामुळे धोपटेश्वर, बदनापूर व देवगाव शिवारातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बदनापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले होते. यंदा मात्र जूनच्या सुरूवातीपासूनच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिके जोमात आली होती. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला होता. सोमठाणा, आन्वा, राजेवाडी येथील धरणे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पिकेही जोमात आली असून, पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला असता वरिष्ठांनी या अहवालाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर धरणाखालील शेतकऱ्यांनी फी भरली असल्याने पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडले आहे. या पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.

यंदा सोमठाणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार धरणातून शनिवारी कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अनधिकृत पाण्याचा वापर करू नये, केवळ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनीच या पाण्याचा फायदा घ्यावा. अनधिकृत पाण्याचा वापर करताना कोणी आढळल्यास कारवाई केली जाईल.

-विराज बोधने, उपअभियंता