शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

अखेर सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

बदनापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ...

बदनापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडले आहे. यामुळे धोपटेश्वर, बदनापूर व देवगाव शिवारातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बदनापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले होते. यंदा मात्र जूनच्या सुरूवातीपासूनच तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिके जोमात आली होती. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला होता. सोमठाणा, आन्वा, राजेवाडी येथील धरणे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पिकेही जोमात आली असून, पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे सोमठाणा धरणातून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला असता वरिष्ठांनी या अहवालाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर धरणाखालील शेतकऱ्यांनी फी भरली असल्याने पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडले आहे. या पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.

यंदा सोमठाणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार धरणातून शनिवारी कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अनधिकृत पाण्याचा वापर करू नये, केवळ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनीच या पाण्याचा फायदा घ्यावा. अनधिकृत पाण्याचा वापर करताना कोणी आढळल्यास कारवाई केली जाईल.

-विराज बोधने, उपअभियंता