शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

अखेर जामखेड येथे पंचनाम्याला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही पंचनाम्याला सुरूवात न झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत ‘लोकमत’ने १२ सप्टेंबरच्या अंकात ‘जामखेड मंडलात पंचनाम्याची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महसूल प्रशासनाकडून पंचनाम्याला सुरूवात करण्यात आली आहे.

जामखेडसह भोकरवाडी, माळेवाडी, लेभेंवाडी, ठाकूरवाडी, बक्षेवाडी, नागेशवाडी, नारळवाडी, विठ्ठलवाडी, जोगेश्वरवाडी, पिंपरखेड, चिंचखेड, राहुवाडी, गंगाराम तांडा, शिरनेर, मठजळगाव, बोडखा आदी गावांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी शेतात हजारो रुपये खर्च करून पेरणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, बाजरी, तूर ही पिके पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून पिकांवर लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच यंदाही अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. २१ गावांमधील ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही जामखेड मंडलात पंचनाम्याला सुरूवात करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, पंचनाम्याला सुरूवात करण्यात आली आहे.

सरसकट पंचनामे करण्याची मागणी

महसूल प्रशासनाकडून केवळ नदीकाठच्या शेतातील पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरसकट पंचनामे करण्याची मागणी पांडुरंग दळवी, परमेश्वर लेभे, भवानीसिंग चौहान, राम जाधव, तुकाराम धुळे, कृष्णा तार्डे, दीपक पांढरे, प्रदीप पवार, राहुल पागिरे, विजय जाधव, विजय पवार, नागेश वीर, रशीद मोमीन, सोहेल तांबोळी, कृष्णा नळकांडे, बळीराम पांढरे, दिनेश चौहान, सोमनाथ पवार आदींनी केली आहे.

फोटो ओळी

शेतात पाणी असतानाही तलाठी बाळासाहेब सानप, कृषी सहाय्यक अमोल गाडेकर, कोतवाल बाबासाहेब तुपे हे पंचनामे करत आहेत.