शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
2
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
3
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
4
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
5
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
6
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
7
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
8
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
9
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
10
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
11
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
12
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
13
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
14
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
15
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
16
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
17
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
18
आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार
19
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
20
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर भोकरदन शहरासाठी दहा टँकरला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:39 IST

गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता.

ठळक मुद्देमंजूषा देशमुख : पाणी शुद्ध करून देणार, जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच मंजुरी दिल्याने टंचाईवर तोडगा शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता.बुधवारी नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, राजाभाऊ देशमुख तसेच उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन तातडीने भोकरदनमध्ये दहा टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच तसा रितसर प्रस्तावही दिला होता. ही मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहिती नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.शहराला पाणीपुरवठा करणारे दानापुर येथील जुई धरण कोरडे पडल्यामुळे शहरात तीव्र पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नगर परिषदेने तातडीची विशेष सभा घेऊन २५ टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे दिला होता. या प्रकरणी बुधवारी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाअधिकाºयांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाणी प्रश्न किती गंभीर आहे याची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाºयांनी ३ आॅक्टोबर रोजी बाणेगाव धरणातील विहिरीतून पाणीपुरवठा करण्यासाठी २४ हजार लीटर क्षमता असलेल्या १० टँकरला मंजुरी दिल्याचे यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले.या टँकरच्या माध्यमातून दररोज ७ लाख २० हजार लीटर पाणी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात ओतून ते नळाद्वारे पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठीही त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था शुद्धीकरण केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.यावेही उपनगरअध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी, मुख्याधिकारी सोंडगे, नगरसेवक, सुरेश शर्मा, संतोष अन्नदाते, संध्या शर्मा, गयाबाई जाधव, शेख रिजवान, विजय इंगळे, नसीमखॉ पठाण, दीपक बोर्डे, हामदू चाऊस, शेख जफर, दीपक तळेकर यांची उपस्थिती होती. यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

टॅग्स :Jalanaजालनाwater transportजलवाहतूक