शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

...अखेर भोकरदन शहरासाठी दहा टँकरला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:39 IST

गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता.

ठळक मुद्देमंजूषा देशमुख : पाणी शुद्ध करून देणार, जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच मंजुरी दिल्याने टंचाईवर तोडगा शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : गेल्या महिनाभरपासून पाणीटंचाईच्या झळांनी भोकरदन शहरातील नागरिक हवालदिल झाले होते. कमी पावसामुळे यंदा शहरातील हातपंपही आटले असून, सर्व भिस्त ही टँकरवर राहणार आहे. भोकरदन शहरासाठी दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा म्हणून नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला होता.बुधवारी नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, राजाभाऊ देशमुख तसेच उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन तातडीने भोकरदनमध्ये दहा टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच तसा रितसर प्रस्तावही दिला होता. ही मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहिती नगराध्यक्षा मंजूषा देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.शहराला पाणीपुरवठा करणारे दानापुर येथील जुई धरण कोरडे पडल्यामुळे शहरात तीव्र पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नगर परिषदेने तातडीची विशेष सभा घेऊन २५ टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे दिला होता. या प्रकरणी बुधवारी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाअधिकाºयांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाणी प्रश्न किती गंभीर आहे याची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाºयांनी ३ आॅक्टोबर रोजी बाणेगाव धरणातील विहिरीतून पाणीपुरवठा करण्यासाठी २४ हजार लीटर क्षमता असलेल्या १० टँकरला मंजुरी दिल्याचे यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले.या टँकरच्या माध्यमातून दररोज ७ लाख २० हजार लीटर पाणी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात ओतून ते नळाद्वारे पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठीही त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था शुद्धीकरण केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.यावेही उपनगरअध्यक्ष इरफानउद्दीन सिद्दीकी, मुख्याधिकारी सोंडगे, नगरसेवक, सुरेश शर्मा, संतोष अन्नदाते, संध्या शर्मा, गयाबाई जाधव, शेख रिजवान, विजय इंगळे, नसीमखॉ पठाण, दीपक बोर्डे, हामदू चाऊस, शेख जफर, दीपक तळेकर यांची उपस्थिती होती. यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

टॅग्स :Jalanaजालनाwater transportजलवाहतूक