शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

११३४ जणांचे भवितव्य आज मतपेटीत होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST

बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या ४३१ जागांसाठी ११३४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद होणार आहे. मतदानप्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय ...

बदनापूर : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या ४३१ जागांसाठी ११३४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद होणार आहे. मतदानप्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

बदनापूर तालुक्यातील जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, यापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ५४ ग्रामपंचायतींतील एकूण १८६ प्रभागांमधील ४३१ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. या तालुक्यातील ४१,४३३ पुरुष व ३७,०५९ महिला असे एकूण ७८,४९२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील दावलवाडी ग्रामपंचायतीत दोन, दूधनवाडी ग्रामपंचायतीत एक, सागरवाडी ग्रामपंचायतीत सात, ढासला ग्रामपंचायतमध्ये चार, भराडखेडा ग्रामपंचायतीत १, अंबडगाव ग्रामपंचायतीत ७, चित्तोड ग्रापमध्ये एक, नजीक पांगरी ग्रामपंचायतीत एक, पाडळी-रामखेडा ग्रामपंचायतीत सहा, म्हसला-भातखेडा ग्रामपंचायतीत ९, विल्हाडी ग्रामपंचायतीत तीन, नांदखेडा ग्रामपंचायतीत सात, राजेवाडी (खो) ग्रामपंचायतीत सात, मालेवाडी (सुं.) ग्रामपंचायतीत दोन, वंजारवाडी ग्रामपंचायतीत चार, वाल्हा ग्रामपंचायतीत नऊ, आन्वी राळा ग्रामपंचायतीत एक, धोपटेश्वर ग्रामपंचायतीत एक अशा १८ ग्रामपंचायतींतील ७३ उमेदवार बिनविरोध निवडले जाणार आहेत. आता ४३१ जागांसाठी दुरंगी, तिरंगी लढत होणार आहे.

६६८ कर्मचारी पाहणार काम

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६३ मतदान केंद्रे आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर एकूण चार असे ६५२ कर्मचारी मतदान प्रक्रियेचे काम पाहणार असल्याची माहिती तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार दळवी, शिंदे यांनी दिली.

तगडा बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १२ पोलीस अधिकारी व २१५ कर्मचारी, होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तालुक्यात दाभाडी, दावलवाडी, नानेगाव, बावणेपांगरी, मानदेऊळगाव आदी संवेदनशील गावे असल्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले.

मतमोजणीकरिता दहा टेबल

तालुक्यातील ग्रापमधील मतदान संपल्यानंतर १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. याकरिता दहा टेबल व ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेबल क्रमांक निहाय गावांची मतमोजणी करण्यात येणार आहे.