शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

केदारखेडा : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरण कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाण्याअभावी रब्बीतील पिकांचे होणारे नुकसान पाहून ...

केदारखेडा : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरण कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाण्याअभावी रब्बीतील पिकांचे होणारे नुकसान पाहून शेतकरी पुत्रांनी सोमवारी महावितरणच्या भोकरदन येथील उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करीत दोन दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलकांनी उपकार्यकारी अभियंता दीपक तुरे यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. याचा फटका रब्बीतील गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा या पिकांना बसत आहे. तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खंडित केलेला विद्युत पुरवठा दोन दिवसांत सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास १८ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयात रुमणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नारायण लोखंडे, विकास जाधव, सिरसगाव मंडपचे सरपंच सूरज सहाणे, बरंजळा साबळेचे सरपंच नारायण साबळे, प्रदीप शिंदे, संदीप भोकरे, अजहर शेख, रवींद्र मोरे, अनिल साबळे, आप्पासाहेब जाधव, अजिनाथ सहाणे, प्रदीप लोखंडे, तुळशीराम साबळे, जगदीश सहाणे, आप्पासाहेब सहाणे, बाबासाहेब शिरसाट, गणेश लोखंडे, आदींच्या सह्या आहेत.

घोषणांनी दणाणला परिसर

यावेळी आंदोलकांनी दिवसा वीज द्या, आमचं जगणं मान्य करा, जय जवान-जय किसान, खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करा, अशा घोषणा दिल्या. युवकांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

कोट

निवडणूक आली की सर्वच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना वीज बिल माफीची आश्वासने दिली जातात. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडतो. त्यात कधी अतिवृष्टीमुळे, तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी देशोधडीला लागत आहेत. त्यात कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे तत्काळ वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नारायण लोखंडे यांनी यावेळी दिला.

फोटो