शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शेतकरी हाच खरा ‘आत्मनिर्भर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

सिंचनाच्या सुविधा वाढीसाठी प्रयत्नांची गरज विष्णू वाकडे जालना : उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार अशी म्हण रूढ आहे. भारत हा ...

सिंचनाच्या सुविधा वाढीसाठी प्रयत्नांची गरज

विष्णू वाकडे

जालना : उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार अशी म्हण रूढ आहे. भारत हा पूर्वीपासून एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीमध्ये घाम गाळून शेतकरी केवळ स्वत:चेच पोट भरत नाही, तर तो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो.

१ जुलै ही राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक यांची जयंती, याचदिवशी साजरी केली जाते. राज्यात आणि देशात आज शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, त्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या दूर झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळेल. जिल्ह्याचा विचार केल्यास, जालना जिल्हा हा बियाणांची पंढरी म्हणून ओळखला जातो. या बियाणांच्या पंढरीला खरी ओळख करून दिली, ती बद्रिनारायण बारवाले यांनी. बदलत्या काळाची गरज ओळखून त्यांनी बीटी बियाणांचा विकास करून कपाशीचे बीटी बियाणे देशात सर्वप्रथम आणले.

त्यामुळे आज कापूस उत्पादनात भारत जगात पहिल्या पाच देशांमध्ये गणला जातो. शेती आणि पाणी हे समीकरण आहे. ही गरज लक्षात घेऊन २५ वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी कडवंची येथे जे पाणलोट क्षेत्र विकसित केले आहे, ते निश्चितच प्रेरणादायी आहे.

कृषी विज्ञान केंद्र, राज्याचा कृषी विभाग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन मिळत आहे, त्यातून शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढून आर्थिक संपन्नता येण्यास मदत झाली आहे.

नवीन तंत्रज्ञानाची कास धरून शेती गरजेची

बदलत्या काळानुसार पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता शक्य नाही. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन उत्पादन वाढविण्याची गरज आहे. शेतीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आलेले आहेत. गरज आहे ती केवळ शेती कुठल्याही परिस्थितीत टिकवून ठेवून ती सांभाळण्याची.