शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करा, रिपाइंला मंत्रिपद द्या; रामदास आठवले

By विजय मुंडे  | Updated: August 30, 2023 17:33 IST

लोकसभेसाठी दोन, विधानसभेसाठी १२ जागांची मागणी एनडीएकडे करण्यात आल्याची माहिती

जालना : लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असून, त्यापूर्वी रखडलेला राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार त्वरित करावा. रिपाइंला एक मंत्रिपद द्यावे, अशी आपली मागणी आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभेसाठी दोन आणि विधानसभेसाठी १० ते १२ जागांची मागणी केल्याची माहिती रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

जालना येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी २०२४ च्या निवडणुकीत एनडीएला ३३० ते ३५० जागा मिळणार असून, विरोधक विरोधी बाकावर बसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने अनेक कल्याणकारी कामे केली असून, पुन्हा एनडीएच सत्तेत येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. आगामी सर्वच निवडणुका एनडीए एकत्र लढणार आहे. त्यानुसार लाेकसभेसाठी दोन, विधानसभेसाठी १२ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जागांची मागणी करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार करावा, रिपाइंला मंत्रिपद द्यावे, अशी आपली मागणी आहे. शिवाय सामाजिक न्याय मंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्र्यांकडे अनेक जबाबदाऱ्या असतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागासाठी एक स्वतंत्र मंत्री द्यावा, अशी मागणी केल्याचेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव ॲड. ब्रम्हानंद चव्हाण, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, सुधाकर रत्नपारखे आदींची उपस्थिती होती.

आमदार सांभाळता आले नाहीत आता आकांडतांडव करतायतउद्धव ठाकरे यांना आमदार सांभाळता आले नाहीत आणि आता आकांडतांडव करतायत. शरद पवार यांचीही अवस्था तशीच आहे. पवार यांनी एनडीएत यावे, अशी भूमिका होती. परंतु, त्यांनी 'इंडियात' राहणे पसंत केले आहे. आमदार संभाळता न येणाऱ्यांनी आकांडतांडव न करता लोकांत जावे. लोकशाही आहे. मतदार योग्य व्यक्तीला संधी देतात, असेही ते म्हणाले.

कायद्यात बदल करणे म्हणजे संविधान बदलणे नव्हेसंविधान बदलले जात असल्याची चर्चा पसरविली जात आहे. एखाद्या कायद्यात बदल करणे म्हणजे संविधान बदल करणे असे होत नाही आणि संविधानात बदल होणार नाही. समान नागरी कायदा हा मुस्लीम विरोधी नसून, या कायद्यामुळे हिंदू - मुस्लीम दरी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे, अशी आपली पूर्वीपासूनच मागणी असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेJalanaजालनाState Governmentराज्य सरकार