शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जास्ती प्रमाणातील पाणीदेखील आपल्या आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:33 IST

जालना : मानवी शरीरातील चयापचयासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु या पाण्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले, तर डोकेदुखी, ...

जालना : मानवी शरीरातील चयापचयासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु या पाण्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले, तर डोकेदुखी, उलटी यासह इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात.

दैनंदिन जीवनात पुरेसे आणि प्रमाणात पाणी पिले, तर पचन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते. शिवाय डोकेदुखी, वजनवाढ, अन्नपचनात प्रमाणित पाण्याचा लाभ होतो. शारीरिक हलचालीनुसार शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे आपले वय, वजनानुसार दैनंदिन आवश्यक पाणी पिणे गरजेचे आहे.

शरीराला पाणी कमी पडले तर...

शरीरात पाण्याचा समतोल राहणे गरजेचे आहे. शरीराला पाणी कमी पडले, तर डोकेदुखी, उलटी, मळमळ यासह इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात. शिवाय मूत्रपिंडावरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच दैनंदिन प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

शरीराला पाणी जास्त झाले तर...

शरीरात पाणी कमी झाल्यानंतर जसे दुष्परिणाम होतात, तसेच पाणी अधिक झाल्यानंतरही होतात. यात डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासह मूत्रपिंडावर अधिकचा भार येऊ शकतो. शिवाय इतरही काही शारीरिक त्रास होऊ शकतात.

तज्ज्ञ काय म्हणतात...

मानवी शरीरातील अन्नपचनासह इतर प्रक्रियांमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु प्रमाणात पाणी पिण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. कमी पाणी पिल्यामुळे जसा त्रास होतो त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात पाणी पिल्यानंतरही शरीराला त्रास होतो.

-डॉ. व्ही.व्ही. पिंगळे

मानवी शरीराला नियमित आणि प्रमाणात पाणी मिळणे गरजेचे आहे. अनेक जण कमी प्रमाणात पाणी पितात. अन्नपचनात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे दैनंदिन आपल्या वय आणि वजनानुसार पाण्याचे सेवन करावे. पाणी पिताना शक्यतो उकळून प्यावे किंवा निर्जंतुकीकरण औषधे वापरून पिण्याचे पाणी प्यावे.

-डॉ. अर्चना भोसले

कोणी किती प्यावे पाणी?

वजनदिवसाला किती

पाणी (लिटर)

३६ किलो १.२

४५ किलो १.५

५४ किलो १.८

६४ किलो २.१

७३ किलो २.४

८२ किलो २.७