शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

जास्ती प्रमाणातील पाणीदेखील आपल्या आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:33 IST

जालना : मानवी शरीरातील चयापचयासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु या पाण्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले, तर डोकेदुखी, ...

जालना : मानवी शरीरातील चयापचयासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु या पाण्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले, तर डोकेदुखी, उलटी यासह इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात.

दैनंदिन जीवनात पुरेसे आणि प्रमाणात पाणी पिले, तर पचन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते. शिवाय डोकेदुखी, वजनवाढ, अन्नपचनात प्रमाणित पाण्याचा लाभ होतो. शारीरिक हलचालीनुसार शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे आपले वय, वजनानुसार दैनंदिन आवश्यक पाणी पिणे गरजेचे आहे.

शरीराला पाणी कमी पडले तर...

शरीरात पाण्याचा समतोल राहणे गरजेचे आहे. शरीराला पाणी कमी पडले, तर डोकेदुखी, उलटी, मळमळ यासह इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात. शिवाय मूत्रपिंडावरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच दैनंदिन प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

शरीराला पाणी जास्त झाले तर...

शरीरात पाणी कमी झाल्यानंतर जसे दुष्परिणाम होतात, तसेच पाणी अधिक झाल्यानंतरही होतात. यात डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासह मूत्रपिंडावर अधिकचा भार येऊ शकतो. शिवाय इतरही काही शारीरिक त्रास होऊ शकतात.

तज्ज्ञ काय म्हणतात...

मानवी शरीरातील अन्नपचनासह इतर प्रक्रियांमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु प्रमाणात पाणी पिण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. कमी पाणी पिल्यामुळे जसा त्रास होतो त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात पाणी पिल्यानंतरही शरीराला त्रास होतो.

-डॉ. व्ही.व्ही. पिंगळे

मानवी शरीराला नियमित आणि प्रमाणात पाणी मिळणे गरजेचे आहे. अनेक जण कमी प्रमाणात पाणी पितात. अन्नपचनात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे दैनंदिन आपल्या वय आणि वजनानुसार पाण्याचे सेवन करावे. पाणी पिताना शक्यतो उकळून प्यावे किंवा निर्जंतुकीकरण औषधे वापरून पिण्याचे पाणी प्यावे.

-डॉ. अर्चना भोसले

कोणी किती प्यावे पाणी?

वजनदिवसाला किती

पाणी (लिटर)

३६ किलो १.२

४५ किलो १.५

५४ किलो १.८

६४ किलो २.१

७३ किलो २.४

८२ किलो २.७