शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

जास्ती प्रमाणातील पाणीदेखील आपल्या आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:33 IST

जालना : मानवी शरीरातील चयापचयासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु या पाण्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले, तर डोकेदुखी, ...

जालना : मानवी शरीरातील चयापचयासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु या पाण्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केले, तर डोकेदुखी, उलटी यासह इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात.

दैनंदिन जीवनात पुरेसे आणि प्रमाणात पाणी पिले, तर पचन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते. शिवाय डोकेदुखी, वजनवाढ, अन्नपचनात प्रमाणित पाण्याचा लाभ होतो. शारीरिक हलचालीनुसार शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे आपले वय, वजनानुसार दैनंदिन आवश्यक पाणी पिणे गरजेचे आहे.

शरीराला पाणी कमी पडले तर...

शरीरात पाण्याचा समतोल राहणे गरजेचे आहे. शरीराला पाणी कमी पडले, तर डोकेदुखी, उलटी, मळमळ यासह इतर शारीरिक त्रास जाणवू शकतात. शिवाय मूत्रपिंडावरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच दैनंदिन प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

शरीराला पाणी जास्त झाले तर...

शरीरात पाणी कमी झाल्यानंतर जसे दुष्परिणाम होतात, तसेच पाणी अधिक झाल्यानंतरही होतात. यात डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासह मूत्रपिंडावर अधिकचा भार येऊ शकतो. शिवाय इतरही काही शारीरिक त्रास होऊ शकतात.

तज्ज्ञ काय म्हणतात...

मानवी शरीरातील अन्नपचनासह इतर प्रक्रियांमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक आहे; परंतु प्रमाणात पाणी पिण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. कमी पाणी पिल्यामुळे जसा त्रास होतो त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात पाणी पिल्यानंतरही शरीराला त्रास होतो.

-डॉ. व्ही.व्ही. पिंगळे

मानवी शरीराला नियमित आणि प्रमाणात पाणी मिळणे गरजेचे आहे. अनेक जण कमी प्रमाणात पाणी पितात. अन्नपचनात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे दैनंदिन आपल्या वय आणि वजनानुसार पाण्याचे सेवन करावे. पाणी पिताना शक्यतो उकळून प्यावे किंवा निर्जंतुकीकरण औषधे वापरून पिण्याचे पाणी प्यावे.

-डॉ. अर्चना भोसले

कोणी किती प्यावे पाणी?

वजनदिवसाला किती

पाणी (लिटर)

३६ किलो १.२

४५ किलो १.५

५४ किलो १.८

६४ किलो २.१

७३ किलो २.४

८२ किलो २.७