शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अपघाताने हिरावले दोन्ही कुटुंबांचे सर्वस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:44 IST

भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त केली.

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : भरधाव ट्रक उलटल्याने उसाच्या ढिगा-याखाली दबून निष्पाप दोन निष्पाप जिवांचा बळी गेला. थेटे आणि चोरमारे या दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वस्व हिरावले गेल्याची भावना दोन्ही मुलांच्या पित्यांनी व्यक्त केली.सार्थकचे वडील राजू थेटे यांना गावाजवळच २० एकर कोरडवाहू शेती आहे. गावात त्यांचे स्वत:चे साधे घर आहे. शेतात कापूस, तूर ही पिके आहेत. त्यांना वैष्णवी (७वी), पार्थ (४ थी) , गायत्री (१ ली) अशी तीन अपत्ये आहेत. ही सर्व मुले जिल्हा परिषद शाळेत शिकणारी. तर ओंकारचे वडील कृष्णा चोरमारे हे सालगडी म्हणून काम इतराच्या शेतात काम करतात. त्यांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. काही महिन्यांपूर्वी ते कामाच्या शोधात पाथरवाला येथे आले होते. तेथेच त्यांना सालगडी म्हणून काम मिळाल्याने ते येथेच राहू लागले. त्यांना स्वत:चे घर नाही. उत्पन्नाचे कुठलेही दुसरे साधन नाही. म्हणून सालगडी म्हणून ते इतर शेतक-यांच्या शेतात काम करत होते.बुधवारचा दिवस या दोन्ही कुटुंबांसाठी घातवारच ठरला. नेहमीप्रमाणे ओंकार आणि सार्थक घराजवळच खेळत असताना उसाने भरलेला ट्रक उलटला आणि या दोन्ही मुलांच्या अंगावर संपूर्ण ऊस पडला. यातच दबून या दोन्ही चिमुकल्या जिवांचा करुण अंत झाला. गावक-यांना कळल्यानंतर ते तात्त्काळ मदतीसाठी गेले. दोन्ही मुलांचा जीव वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण तोपर्यंत या दोन्ही जिवांनी जगाचा निरोप घेतला होता. मुलांचा काहीही दोष नसताना जीव गमवावा लागल्याने दोन्ही मुलांच्या आईवडिलांनी आक्रोश केला. या घटनेनंतर दोन्ही मातांनी फोडलेल्या हंबरड्याने तर उपस्थितांचे हृदय हेलावले होते.