शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
3
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
4
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
5
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
6
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
7
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
8
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
9
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
10
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
12
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
13
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
14
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
15
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
16
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
17
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
18
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
19
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
20
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
Daily Top 2Weekly Top 5

प्राणवायूसाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करावे- अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

जालना : आजघडीला भारतात बेसुमार वृक्षतोडीमुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. निसर्गाचा समतोल राखला जाऊन मानवी ...

जालना : आजघडीला भारतात बेसुमार वृक्षतोडीमुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. निसर्गाचा समतोल राखला जाऊन मानवी जीवन सुकर व्हावे, या दृष्टिकोनातून वृक्षलागवडीची चळवळ उभी होण्यासाठी राज्यात १० लाख वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्षांपासून नैसर्गिकरीत्या प्राणवायूची अधिकाधिक निर्मिती होऊन समाजातील प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले.

अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांच्या हस्ते शुक्रवारी घनसावंगी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, संत रामदास महाविद्यालय, पंचायत समिती येथे वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार नरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी एम. जी. जाधव, शिक्षणाधिकारी मंगल तुपे, गटशिक्षण अधिकारी रवी जोशी, मुख्याधिकारी नगर पंचायत विक्रम मांडुळगे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे, सुधाकर कापरे, आर. बी. वाहुळे, शिवाजी उगले, पंजाबराव देशमुख, ॲड. राजेंद्र देशमुख, नंदकुमार देशमुख, शेख न्याजू, रजाक बागवान, नरेंद्र जोगड, प्राचार्य राजेंद्र परदेशी, उपप्राचार्य सुभाष जाधव, भगवान मिरकड आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना अभ्यंकर म्हणाले, मानवी जीवनामध्ये वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृक्षांची बेसुमार तोड करण्यात येऊन त्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येत नसल्यामुळे अनेक संकटे आपल्यासमोर येत आहेत. कोरोना या आजारामध्ये सुद्धा प्राणवायूंच्या कमतरतेमुळे आपल्याला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. याच प्राणवायूंच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे वाढते प्रदूषण कमी होऊन नैसर्गिकरीत्या प्राणवायूची निर्मिती होण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असल्याचेही त्यांनी सांगितले. अंबड तालुक्यातील जिजामाता हायस्कूल किनगाव येथेही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसीलदार अंबड कडवकर, गटशिक्षण अधिकारी विपुल भागवत, लक्ष्मीकांत आटोळे आदींची उपस्थिती होती.